नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांचा मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिस तपासात पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राधेशामचा मृतदेह बापू पुलानजीक तरंगत होता. बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी तो बघितल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली होती. राकेश यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खूनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी याघटनेचा तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. अंबड पोलिस ठाण्यात पत्नी आणि तिचा प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेशामला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे कळाल्यानंतर तो मानसिक तणावात होता. पत्नी आणि तिचा प्रियकर त्याला त्रास देत होते. त्यामुळे राधेशामने आत्महत्या केली. राधेशाम हा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याने पत्नी आणि प्रियकर यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.