नाशिक : त्र्यंबकनाका ते अशोकनगर दरम्यान रिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेच्या प्रवासी बॅगेची चैन उघडून सहप्रवाश्यांनी पर्स मधील सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे दागिणे लंपास केले. या चोरीची विठ्ठल जिंगू पाटील (६४ रा.नागरे चौक,अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील दांम्पत्य बाहेरगावी गेले होते. शनिवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास दांम्पत्य परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. त्र्यंबकनाका सिग्नल येथून अशोकनगर येथे जाण्यासाठी या दांम्पत्याने रिक्षातून प्रवास केला. पाटील दांम्पत्य रिक्षात बसण्यापूर्वीच या रिक्षात मराठी भाषा बोलणारे अन्य दोन प्रवासी होते. चालक व सहप्रवाश्यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, चंदन पाटील या महिलेच्या प्रवासी बॅगेची चैन उघडून भामट्यांनी पर्स कापून त्यातील सुमारे २ लाख ३५ हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. ही बाब घरी पोहचल्यानंतर पाटील दांम्पत्याच्या निदर्शनास आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत