येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-औरंगाबाद महामार्गावर अंदरसुल गावाजवळील वळणावर असलेल्या स्पिड ब्रेकरमुळे पिकअप व कंटेनर एकमेकांवर आदळली. या अपघाता पिकअपला जोरदार धडक बसल्याने पिकअप पलटी झाली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टमाटे विक्री करुन पिकअप गाडी वैजापूरकडे जात असतांना अचानक स्पिड ब्रेकर दिसल्याने चालकाने ब्रेक दाबताच मागावून येणारा कंटेनर धडकल्याने हा अपघात झाला.