शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्येबाबत हायकोर्टाने दिला हा मोठा निर्णय

एप्रिल 17, 2023 | 4:15 pm
in संमिश्र वार्ता
0
BMC e1675787084747

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. विशेषतः राज्याची राजधानी मुंबई शहराचा कारभार चालविणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. परंतु सध्या या महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रश्न चर्चेत आहे. त्याच मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्येच्या वादावर मुंबई हायकोर्टानं महत्वाचा निकाल दिला आहे. मुंबई मनपातील एकूण प्रभाग संख्या २२७ राहणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई मनपातील प्रभाग संख्या वाढवून २३६ इतकी करण्यात आली होती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्यासाठी एकनाथ शिंदे-भाजप सरकारने घेतलेला निर्णय आणि त्याअनुषंगाने काढलेला अध्यादेश व त्यानंतर केलेली कायदादुरुस्ती याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

याप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाल मुंबई महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मविआ सरकारचा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप केला होता. राज्यातील सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ निर्णय बदलत मुंबई मनपातील प्रभाग संख्या पूर्ववत केली होती.

मुंबई महापालिका, तसेच पुणे , पिंपरी-चिंचवड , नागपूर , नाशिक , कल्याण डोंबिवली , वसई-विरार , कोल्हापूर आणि नवी मुंबई या महापालिकांचा समावेश आहे. या सर्व महानगरपालिकांमधील सभागृह विसर्जित झाल्यामुळे सध्या या सर्व ठिकाणी प्रशासकांमार्फत कारभार चालवला जात आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या शहरांमधील कारभार दीर्घकाळ प्रशासकांमार्फत चालवणे श्रेयस्कर ठरणार नाही. तसेच महानगरपालिका निवडणुका लवकर घेण्यासाठी सर्वजण आग्रही आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या यांच्या नव्या निर्णायाविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल केली होती. मविआ सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता २३६ प्रभाग गरजेचे असल्याचे पेडणेकर यांनी याचिकेत म्हटले.

राज्य सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद सराफ यांनी बाजू मांडताना मुंबईतील प्रभाग संख्येची रचना सन २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावरच केली असल्याचे सांगत कोरोनामुळे अद्याप जनगणना झालेली नाही, त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या शक्यतेच्या आधारावर प्रभागांची रचना बदलणे योग्य नाही, असेही स्पष्ट केले, त्यानंतर राज्य सरकारची बाजू मान्य करत शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबई मनपातील प्रभाग संख्या २२७ इतकीच राहणार आहे. म्हणजेच नगरसेवकांची संख्या पूर्वी इतकीच राहणार आहे.

Mumbai High Court on BMC Number of Wards

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा कर आता भरावाच लागणार नाही; महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post

कर्नाटकात सत्ता आल्यास काय काय करणार… राहुल गांधींनी दिली जबरदस्त ही आश्वासने… चर्चा तर होणारच..

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Rahul Gandhi e1672477307964

कर्नाटकात सत्ता आल्यास काय काय करणार... राहुल गांधींनी दिली जबरदस्त ही आश्वासने... चर्चा तर होणारच..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011