मुंबई – राज्यातील मुंबई वगळता इतर १३ महापालिकांच्या आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे. या १३ महानगरपालिकेत नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेची आरक्षणाची सोडत नंतर जाहीर होणार आहे.
१३ महापालिकांच्या आरक्षणाची नोटीस २७ मे ला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर जागा निश्चितीकरता आरक्षण सोडत ३१ मे रोजी असणार आहे. १ जून रोजी प्रभाग नि हाय आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे. तर १ ते ६ जून आरक्षणावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षांशिवाय होणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.