मनमाड – शहरातील इंदिरा नगर भागातील रहिवाशानी आज महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेत इंदिरा नगर परिसराचा विजपुरवठा पुन्हा चंदनवाडी विभागाला जोडून देण्याची मागणी केली आहे. या भागातील नागरीक नियमितपणे विज बिल भरणा करीत असतांना सुध्दा कँम्प विभागाला येथिल परिसराचा विज पुरवठा जोडण्यात आलेला असल्याने वारंवार लाईट जात-येत असतो त्यामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.त्यामुळे या विभागाचा विद्युत पुरवठा पुन्हा चंदनवाडीला जोडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.