अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातून वाहणा-या मोसम नदीला परवा रात्री मोठा पूर आल्याने मालेगाव शहरातील श्रीरामनगर-द्याने या रस्त्यावरील फरशी पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता बंद होता. आज पाणी कमी झाल्याने या रस्त्यावरुन दुचाकीवरुन दोघे जात असतांना दुचाकी चालविणा-याचा तोल गेल्याने ते खाली पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. हे वृत्त समजताच मालेगाव अग्निशामक पथकातील पट्टीच्या पोहणा-यांनी शोध कार्य सुरु केले. मात्र दोघा तरुणांचा मात्र कुठलाही ठावठिकाणा लागू शकला नाही संध्याकाळ नंतर शोधकार्य थांबविण्यात आला असून उद्या सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु होणार आहे.