नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसे यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, मालेगाव तालुक्यातील बोरी-आंबेदरी प्रकल्पग्रस्तांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बोरी-आंबेदरी धरणातून बंदिस्त पाईपलाईनच्या योजनेला शेतक-यांचा तीव्र विरध आहे. यासंदर्भात प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्याने आंदोलकांनी आता थेट नागपूर येथे राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील शेतकरी गेल्या ४८ दिवसांपासून प्रकल्पस्थळी उपोषण करीत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांची कुठलीही दखल घेत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले आहे.