रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

काय सांगता? तब्बल एक लाख एकर शेतीला बांधच नाही! कुठे आणि कसं काय?

by Gautam Sancheti
जानेवारी 29, 2023 | 5:31 am
in राज्य
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक एकर शेत असेल तरी बांध घालण्याची परंपरा आहे. आणि याच बांधावरून भावा-भावांमध्ये, मित्रांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये तंटे होण्याचीही परंपरा आहे. बांध्यावरची प्रकरणं वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असल्याचे आपण बघतोय. पण महाराष्ट्रातील एका गावात १ लाख एकर शेतीला बांधच नाही. आणि बांधन नसलेल्या या शेतीचे कौतुक आजपर्यंत देशभर होत आले आहे.

शेतीवर बांध उभा करण्यावरून कित्येक लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले आपण बघितले आहे. विथभर अंतर जरी वाढले किवा कमी झाले तर खास मित्रांमध्येही वैर निर्माण झाल्याचे आपण बघितले आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावाने एक वेगळाच आदर्श जगापुढे घालून दिला आहे. एक-दोन वर्षाची ही कहाणी नसून शेकडो वर्षांची परंपरा गावकरी पुढे नेत आहेत. या गावात शेतीला बांध न घालण्याची ही परंपरा खरं तर नव्या काळात आदर्श ठरावी अशीच आहे.

या गावातील कुठल्याही रस्त्याने जाताना तुम्ही शेताकडे बघितले तर तुम्हाला कुठेही बांध नजरेस पडणार नाही. विशेष म्हणजे शेतीचे मालक आपलं शेत लक्षात ठेवतील, पण बैलांना कसे कळत असेल, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या गावाचं हेच वैशिष्ट्य आहे. बैलांना देखील बांधाशिवाय असलेलं आपल्या मालकाचं शेत ओळखता येतं. एखाद्या शेतजमिनीचे दहा हिस्से झाले तरी दहा भावंडांमध्ये शिवारावरून कधीच वाद झाले नाहीत.

बांध टिकतच नाही म्हणून…
अनेकांनी सुरुवातीला बांध नसण्याला चमत्कार मानले. पण तसे काहीही नसून मंगळवेढ्यातील जमिनीला धर नसल्याने असे घडत असल्याचे सांगितले जाते. एक हलका पाऊस आला तरी बांध वाहून जातो. त्यामुळे शेतकरीही बांध बांधत नाहीत. फारच वेळ आली तर एखादा दगड, एखादे झुडूप यावरून शेतीचा बांध ठरवतात. पण कधीही एकमेकांशी बांध्यावरून भांडत नाहीत.

रात्री मुक्काम नाहीच
मंगळवेढ्यातील माती काळी आहे आणि संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळे इथे सकाळी आलेला शेतकरी आपली दिवसभराची खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो. तो सकाळी शेतात येतो आणि सायंकाळी काम करून परत जातो. जमिनीला धर नसल्याने काळ्या मातीत साधं झोपडंही उभं करणं शक्य नाही.

Maharashtra Village Farm Land No Border
Agriculture

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान (व्हिडिओ)

Next Post

अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या LIC आणि SBIचे कोट्यवधींचे नुकसान; अर्थमंत्र्यांचेही मौन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Next Post
share market

अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या LIC आणि SBIचे कोट्यवधींचे नुकसान; अर्थमंत्र्यांचेही मौन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011