India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

काय सांगता? तब्बल एक लाख एकर शेतीला बांधच नाही! कुठे आणि कसं काय?

India Darpan by India Darpan
January 29, 2023
in राज्य
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक एकर शेत असेल तरी बांध घालण्याची परंपरा आहे. आणि याच बांधावरून भावा-भावांमध्ये, मित्रांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये तंटे होण्याचीही परंपरा आहे. बांध्यावरची प्रकरणं वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असल्याचे आपण बघतोय. पण महाराष्ट्रातील एका गावात १ लाख एकर शेतीला बांधच नाही. आणि बांधन नसलेल्या या शेतीचे कौतुक आजपर्यंत देशभर होत आले आहे.

शेतीवर बांध उभा करण्यावरून कित्येक लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले आपण बघितले आहे. विथभर अंतर जरी वाढले किवा कमी झाले तर खास मित्रांमध्येही वैर निर्माण झाल्याचे आपण बघितले आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावाने एक वेगळाच आदर्श जगापुढे घालून दिला आहे. एक-दोन वर्षाची ही कहाणी नसून शेकडो वर्षांची परंपरा गावकरी पुढे नेत आहेत. या गावात शेतीला बांध न घालण्याची ही परंपरा खरं तर नव्या काळात आदर्श ठरावी अशीच आहे.

या गावातील कुठल्याही रस्त्याने जाताना तुम्ही शेताकडे बघितले तर तुम्हाला कुठेही बांध नजरेस पडणार नाही. विशेष म्हणजे शेतीचे मालक आपलं शेत लक्षात ठेवतील, पण बैलांना कसे कळत असेल, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या गावाचं हेच वैशिष्ट्य आहे. बैलांना देखील बांधाशिवाय असलेलं आपल्या मालकाचं शेत ओळखता येतं. एखाद्या शेतजमिनीचे दहा हिस्से झाले तरी दहा भावंडांमध्ये शिवारावरून कधीच वाद झाले नाहीत.

बांध टिकतच नाही म्हणून…
अनेकांनी सुरुवातीला बांध नसण्याला चमत्कार मानले. पण तसे काहीही नसून मंगळवेढ्यातील जमिनीला धर नसल्याने असे घडत असल्याचे सांगितले जाते. एक हलका पाऊस आला तरी बांध वाहून जातो. त्यामुळे शेतकरीही बांध बांधत नाहीत. फारच वेळ आली तर एखादा दगड, एखादे झुडूप यावरून शेतीचा बांध ठरवतात. पण कधीही एकमेकांशी बांध्यावरून भांडत नाहीत.

रात्री मुक्काम नाहीच
मंगळवेढ्यातील माती काळी आहे आणि संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळे इथे सकाळी आलेला शेतकरी आपली दिवसभराची खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो. तो सकाळी शेतात येतो आणि सायंकाळी काम करून परत जातो. जमिनीला धर नसल्याने काळ्या मातीत साधं झोपडंही उभं करणं शक्य नाही.

Maharashtra Village Farm Land No Border
Agriculture


Previous Post

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान (व्हिडिओ)

Next Post

अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या LIC आणि SBIचे कोट्यवधींचे नुकसान; अर्थमंत्र्यांचेही मौन

Next Post

अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या LIC आणि SBIचे कोट्यवधींचे नुकसान; अर्थमंत्र्यांचेही मौन

ताज्या बातम्या

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group