बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजित पवार भाजपसोबत गेल्यास काय करणार? शिंदे गटाने घेतला हा निर्णय

by Gautam Sancheti
एप्रिल 18, 2023 | 4:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shinde Fadnavis

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राज्यात सर्वत्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषेदतून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आले तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. परंतु, अजितदादा हे राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात अजित पवारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही, विशेषतः पहाटेच्या शपथविधीवरून हे सर्वांनीच चांगले अनुभवले आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सध्या फक्त आणि फक्त अजित पवार यांचीच सर्वाधिक चर्चा सुरु आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. सोमवारी अजित पवारांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा झाली. त्यानंतर आता अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ठेवल्या असल्याच्या चर्चा सुरु आहे.

विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अजित पवार आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे सद्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात अजित पवारांची चर्चा होत आहे. त्यातच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची म्हणजेच शिवसेनेची भूमिका मांडली. शिरसाट म्हणाले की, आघाडीत बिघाडी झालेली आहे. दादा राष्ट्रवादी सोडून आले तर स्वागत आहे. दादांच्या येण्याने आमच्यात अस्वस्थता नाही. अजित पवार निघाले तर त्यांची वैचारिक भूमिका स्वतंत्र आहे. सगळ्याच पक्षात चलबिचल आहे. विशेष म्हणजे १५ आमदार असलेला पक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहू नये याविरोधात आम्ही उठाव केला होता. परंतु सध्या अजित पवारांना मोकळीक नाही. त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर त्यांचे स्वागत आहे. आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही, असे देखील संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. खरे तर राष्ट्रवादी हा शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिका दादांना स्वीकाराव्या लागतील. दादांची ताकद आता राष्ट्रवादीत शरद पवार यांच्यापेक्षा जास्त वाढलेली आहे. विधानभवनात त्यांना मोठ्या संख्येने आमदार भेटायला त्यावरुन दादांच्या ताकदीचा अंदाज लावावा, असेही शिरसाट म्हणाले.

विशेष बाब अशी की, मुख्यमंत्र्यांनी माझी काल मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली. त्यानंतर कालपासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजितदादा चर्चेचा विषय आहेत. त्यांचा फोन नॉट रिचेबल लागणे हे नवीन नाही. दादांची नाराजी आणि आमच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा काही संबंध नाही, असे शिरसाट म्हणाले.

खरे तर अजित दादांची नाराजी पार्थ पवारांच्या पराभवापासून आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी अजितदादांना मोहरा केले असून. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दादांचे स्थान शोधावे लागते. टाईम साधणारा नेता अशी ओळख असलेल्या नेत्याला बोलूही दिले जात नाही. दादांना साईड केला जात असून हा त्यांचा अपमान आहे. धनंजय मुंडेंनी मला एक किस्सा सांगितला होता. माजी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा त्यांनी अजित पवारांकडे व्यक्त केली होती. त्यावेळी दादांनी ते मलाच भेटत नाही, तुला काय भेटणार असे अजितदादांनी म्हटले होते, असेही शिरसाट यांचे म्हणणे आहे.

Maharashtra Politics Ajit Pawar BJP Shivsena Stand

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता सुप्रिया सुळेंनी दिले ‘हे’ संकेत… १५ दिवसात नक्की काय घडणार… चर्चांना आणखीन वेग

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावरील ही कामे पावसाळ्यापूर्वीच होणार; बांधकाममंत्र्यांचे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Mumbai Goa Highway

मुंबई-गोवा महामार्गावरील ही कामे पावसाळ्यापूर्वीच होणार; बांधकाममंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011