India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तयार रहा! ‘त्या’ ३,५०० पदांवर येत्या २ महिन्यात होणार भरती; राज्य सरकारची तयारी

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिगर आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिसंख्य ठरविल्यामुळे रिक्त झालेल्या ३,५०० पदांवर आदिवासी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. पुढील २ महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

राज्य शासनाच्या अखत्यारीतील विभाग, महामंडळांमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली पदे खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे बिगर आदिवासींनी बळकावली. परिणामी आदिवासी समाजातील युवक शासकीय नोकऱ्यांपासून वंचित राहिले. १९९५ पासून याबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. अनेकदा बिगरआदिवासी अधिकारी कर्मचाऱ्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून संरक्षण देण्यात आले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकून रिक्त होणाऱ्या जागांवर आदिवासी उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात, असा निर्णय न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिला.

कालबद्ध कार्यक्रम
न्यायालयाच्या निर्णयाची कालबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन आदेश काढला आहे. त्यानुसार नव्याने पदभरती करून आदिवासी युवकांना सामावून घेतले जाणार आहे. पण, या निर्णयाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे विचारणा केली असता, अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे अवैध ठरल्याने अधिसंख्यपदांवर बिगरआदिवासींच्या नियुक्त्या केल्यानंतर विविध विभागांमध्ये ३५०० पदे रिक्त झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. रिक्त झालेली ही पदे आदिवासी समाजातून भरण्यासाठी ये्त्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतही त्यांनी ही माहिती दिली होती.

बिगर आदिवासींनाही संरक्षण
राज्य शासनाने यावेळी पुन्हा मानवतावादी दृष्टिकोन दाखवित बिगर आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकणे टाळले आहे. त्यांची विविध विभागांमध्ये अधिसंख्यपदे निर्माण करून त्यावर वर्णी लावण्यात आली आहे. यामुळे मूळ जामा रिकाम्या झाल्या आहेत. विशेष मोहीम राबवून आदिवासींच्या रिक्त जागा १ फेब्रुवारी २०२० पर्यंत भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Government 3500 Posts Recruitment Process


Previous Post

नाशकातील गोळीबार प्रकरणः शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पुत्रावर अखेर गुन्हा दाखल

Next Post

ऐश्वर्याची कन्या आराध्याला पाहून सारेच थक्क! सोशल मिडियात कमेंटचा पाऊस (व्हिडिओ)

Next Post

ऐश्वर्याची कन्या आराध्याला पाहून सारेच थक्क! सोशल मिडियात कमेंटचा पाऊस (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group