मुंबई – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर, राज्याच्या अन्य भागातही प्रतिसाद आहे. काही शहरांमध्ये व्यापारी पेठा पूर्णपणे बंद आहेत. मुंबईत तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही बंदमध्ये सहभाग घेतल्याने रस्त्यावर मोठा शुकशुकाट आहे. बघूया राज्यात सद्यस्थिती काय आहे