नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – लष्करात भरतीसाठी केंद्राने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून विरोध होताना दिसत आहे. अनेक राज्यात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे ही योजना सध्या विशेष चर्चेत आहे. अग्निपथ योजना बनवणारे संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांचे सध्या काय म्हणणे आहे. युवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अनिल पुरी म्हणाले की, लष्करात या योजनेची आजपासून नाही तर कारगिल युद्धाच्या काळापासून गरज होती. आजच्या काळात लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे, परंतु कारगिलमध्येच आम्हाला हे सरासरी वय 26 वर्षे करण्यास सांगितले होते. अधिकाधिक जवानांना या योजनेत आणणे हा अग्निपथ योजनेचा उद्देश आहे.
अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ नागरिकांमध्ये हा प्रश्न अधिक आहे की, चार वर्षे लष्करी सेवेनंतर तरुण काय करणार? या प्रश्नावर पुरी म्हणाले की, “या योजनेअंतर्गत दहावीनंतर येणाऱ्या तरुणांना विशेष प्रमाणपत्र मिळेल. यामुळे या योजनेंतर्गत येणाऱ्या प्रत्येक युवकाला चार वर्षांनंतर शिस्त लावली जाईल, त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, अशी मदत करण्यात येईल.
अग्निपथ योजना द्वारा बतौर अग्निवीर सेना में शामिल होने वाले युवाओं के लिए गृह मंत्रालय ने की कई घोषणाएं, जिससे युवाओं के पास 4 साल बाद होगी सुनहरे अवसरों की भरमार।#BharatKeAgniveer #Agnipath #Agniveer pic.twitter.com/yRS3rQyDCy
— MyGovIndia (@mygovindia) June 19, 2022
सेनेत भरती होणारे बहुतांश तरुण हे गावातील आहेत. अशा परिस्थितीत, या योजनेंतर्गत, तो 4 वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर 12 लाख रुपये जमा करू शकणार आहेत. ज्याद्वारे ते काही व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांना हवे असल्यास नवीन ट्रॅक्टर घेऊन ते शेती करू शकतात. या पैशातून तरुण आपले काम करू शकतात. तसेच येणारी पिढी तंत्रज्ञानात आपल्यापेक्षा खूप पुढे असेल. त्यांच्या या ज्ञानाचा फायदा लष्कराला मिळू शकतो. ज्याचा उपयोग देशाच्या संरक्षणासाठी केला जाऊ शकतो. लष्कराला सशक्त व तरुण बनवण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा निर्णय एका दिवसात झाला नसून, गेल्या दोन वर्षांपासून यावर विचार सुरू आहे.
नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या योजनेतील उमेदवारांचे वय 21 वर्षावरून 23 वर्षे करण्यात आले आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात भरती होणारे 25 टक्के तरुण चार वर्षांनंतरही देशाची सेवा करत राहतील. पण आणखी 75 टक्के तरुणांकडे भविष्यासाठी कौशल्ये असतील. लष्कराच्या प्रशिक्षणामुळे तरुणांना पुढे जाण्यास मदत होईल. आम्ही जाळपोळ करण्याच्या बाजूने नाही. अशा तरूणांना सैन्यात स्थान नाही. तसेच लष्कराला तरुण, आधुनिक आणि अधिक प्रभावी दल बनवणे हे पहिले प्राधान्य आहे, असे पुरी यांनी स्पष्ट केले.
lieutant general anil puri on agneepath scheme benefits defence recruitment