इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग
कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे. आणि आपल्यात बदल घडवून आणण्याच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतर जण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव हा स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हाच स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.