इंडिया दर्पण – हास्य षटकार – मामाकडे जायचं की आत्याकडे
(पॉलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी एका सेमिनार मध्ये किस्सा सांगत होता)
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी
वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते.
“उद्या आपण बाहेरगावी जायचं आहे.
दोन ऑप्शन्स आहेत.
तुमच्या आत्याकड जायचं किंवा तुमच्या मामाकडे जायचं.
बहुमताने जे ठरेल तिथं उद्या जाऊया.”
मुलांची आई म्हणाली
“मुलांच्या मामाकडे जायचं आहे.”
मुलं एकसूरात म्हणाली,
“आत्याकड जायचं..!”
बाबा म्हणाले, “ठिक. बहुमत झालं. तुमच्या आत्याकडे जाऊ.”
मुलांनी स्वप्न पाहण्यास सुरु केली…
आत्याकडे जायची, तिथं काय काय मज्जा करायची
यांची स्वप्नं रंगवत मुलं झोपी गेली.
सकाळी उठून पटापट तयार झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांची आई न्हाणीघरातून
स्वतःचे लांबसडक ओले केस
टॉवेलने झाडत, गालातल्या गालात हसत
बाहेर आली आणि म्हणाली,
“बाळांनो, पटापट नाष्टा करून घ्या.
आपल्याला मामाकडे जायचं आहे..!”
मुलांनी अविश्वसनीय नजरेनं बाबांकडे पाहिलं.
ते गपचूप आणि लक्षपूर्वक वर्तमानपत्र वाचण्याचा अभिनय करत होते..!
बास…! त्यादिवशी उमजलं की,
लोकतंत्रात बहुमताचा आदर, मताचा मान वगैरे सगळं बकवास आहे..!
खरा निर्णय तर बंद खोलीत त्यावेळेस होतो
ज्यावेळेस गरीब निःसहाय आणि निष्ठावंत जनता
झोपी गेलेली असते…!!!
– हसमुख
(सोशल मिडियातून साभार)