India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जिओफोन ग्राहकांसाठी ३०० मिनिटांचे विनामूल्य कॉलिंग; रिचार्जवर आणखी एक रिचार्ज फ्री

India Darpan by India Darpan
May 14, 2021
in वाणिज्य
0
तगडा निर्णय! जिओचा 5G स्मार्टफोन एवढ्याला मिळणार…
0
SHARES
664
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter
विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लॉकडाऊन किंवा इतर कारणांमुळे रिचार्ज करण्यास असमर्थ असणार्‍या आपल्या जिओफोन ग्राहकांना ३०० मिनिटांचे विनामूल्य आउटगोइंग कॉलिंग प्रदान करेल. रिचार्ज न करता, जिओफोन ग्राहक आता दररोज १० मिनिटे त्यांच्या मोबाइलवर बोलू शकतील. कंपनी दररोज १० मिनिटांसाठी या हिशोबाने महिन्याला ३०० मिनीटे विनामूल्य आउटगोइंग कॉलिंग प्रदान करेल. इनकमिंग कॉल पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहतील. कंपनीने जाहीर केले आहे की साथीच्या काळात ही सुविधा सुरू राहील. त्याचा फायदा कोट्यवधी जिओफोन ग्राहकांना होईल.
देशातील बहुतेक राज्ये लॉकडाऊन  आहेत, लोक घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत मोबाइल रिचार्ज करणे कठीण झाले आहे. विशेषत: वंचित लोकांसाठी हे एक अतिशय कठीण काम आहे. रिलायन्स जिओने केवळ जिओफोन ग्राहकांना या कोंडीतून मुक्त करण्यासाठी ही ऑफर सादर केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की साथीच्या काळात कंपनीला याची खात्री करून घ्यायची आहे की समाजातील वंचित घटक सुद्धा मोबाइल द्वारे कनेक्टेड  राहतील.
रिलायन्स जिओची मोबाईल रिचार्ज करणार्‍या जियोफोन ग्राहकांसाठी एक विशेष योजना देखील आहे. जिओफोनच्या प्रत्येक रिचार्जवर, कंपनी त्याच किंमतीची अतिरिक्त रिचार्ज विनामूल्य देईल. म्हणजे जिओफोन ग्राहकाने ७५ रुपयांच्या २८ दिवसांच्या वैधतेसाठी असणाऱ्या प्लॅन चे रिचार्ज केले तर त्याला ७५ रुपयांचे आणखी एक विनामूल्य रिचार्ज मिळेल, जे ग्राहकला पहिला रिचार्ज संपल्यानंतर वापरता येईल
रिलायन्स फाउंडेशन रिलायन्स जिओबरोबर लोकांना मोबाइल नेटवर्कद्वारे जोडून ठेवण्यासाठी काम करत आहे. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना साथीने देशासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे आणि यावेळी रिलायन्स प्रत्येक भारतीयांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभे आहे.

Previous Post

परदेशातून येणाऱ्या कोविडविषयक मदतसाहित्याची अद्यावत माहिती

Next Post

कोविड मृत्यू : ५० लाखांच्या विमा संरक्षणास या तारखेपर्यंत मुदतवाढ

Next Post
गुड न्यूज – आता राज्यात कोरोना चाचणीसाठी १२०० रुपये लागणार

कोविड मृत्यू : ५० लाखांच्या विमा संरक्षणास या तारखेपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group