नाशिक – भारताच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता दिवसांनिमित्त “आम्ही कधी ही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही, सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा राजकीय वा आर्थिक गा-हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ सर्व अधिकारी कर्मचा-यांना देण्यात आली. महिलांनी ही इंदिरा गांधीजी सारखे घडावे, देशाच्या इतिहासात भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी महिला पंतप्रधान म्हणून त्यांच्या नेतृत्वाबददल बोलत महिलांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी स्वाती थवील, तहसीलदार दिपाली गवळी, तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकॄष्ण देशपांडे, दिनेश वाघ सर्व अधिकारी आणि कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.