येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यात विविध ठिकाणी घरफोडी, शेतपंपांच्या चोरी व पाळीव प्राणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतांना जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशाने विशेष पथकाने चोरीच्या घटनेचा तपास करत येवला तालूक्यातील पाच जणांच्या टोळीला अटक केली.
त्यांच्या ताब्यातून चोरीच्या शेती पंपाच्या ११ विद्युत मोटर तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकल जप्त करत असा दोन लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून येवला तालुका पोलिस अधिक चौकशी करत आहे.