नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. यातील दोघांनी गळफास घेऊन तर एकाने विषारी औषध सेवन केले. या तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड, पंचवटी व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना पेठरोड भागात घडली. अनिल जगन्नाथ मिस्त्री (४५ रा.नवनाथनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पुतण्या जयेश मिस्त्री यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. आशिष सबणे यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.
दुसरी घटना शिंगवेबहुला येथे घडली. शरद रमेश गांगुर्डे (३१ रा.अंबडवाडी) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना उघडकीस येताच मेव्हणे किसन पांडे यांनी त्यास तात्काळ देवळाली कॅम्प येथील कॅ न्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता डॉ.बावस्कर यांनी तपासूण मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.
तिस-या घटनेत पळसे ता.जि.नाशिक येथील वैष्णवी अनिल पवार (३० रा.पूर्वी प्रार्थना सोसा.सोमय्यानगर) हिने शनिवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत सुनिल गायधनी यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.