मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – पाकिस्तानच्या अजेंड्याला चालना देणार्या ह्युंदाई कंपनीच्या वादग्रस्त पोस्टबद्दल भारतीयांनी निंदा केली आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरसाठी पाकिस्तानने रविवारी आझाद काश्मीर दिन साजरा केला, जेव्हा Hyundai आणि Kia च्या पाकिस्तानी युनिट्सने फेसबुक आणि ट्विटरवर याचे उघडपणे समर्थन केले तेव्हा निषेध सुरू झाला. पोस्टमध्ये पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचे समर्थन करून काश्मीर भारतापासून तोडण्याची प्रार्थना केली होती आणि दल सरोवरातील बोटीचे चित्र आणि काटेरी तारांनी बांधलेले काश्मीरचे नाव दाखवले होते. ह्युंदाईच्या याकथित पत्रावर भारतीय नागरिकांचा संताप आणखीनच भडकला. या बद्दल कंपनीने माफी मागावी, असेही अनेक भारतीय म्हणाले.
भारतात कार्यरत असलेली बहुराष्ट्रीय कंपनी ही पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला देशाविरुद्ध समर्थन देऊ शकते का? भारताच्या अखंडतेविरुद्ध पाकिस्तानी प्रचाराला चालना देऊ शकते का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे करत असताना भारतात व्यवसाय करता येईल का? असा प्रश्न सोशल मीडियावर नागरिकांनी कार निर्माता कंपनी ‘ह्युंदाई’ आणि तिची 33 टक्के भागीदारी कंपनी ‘किया मोटर्स’ला विचारला आहे. Hyundai India विरूद्ध हजारो वापरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली, त्यानंतर कंपनीने त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला आणि अधिक वापरकर्त्यांनी ह्युंदाई कारवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.
तसेच देशाच्या अंतर्गत आणि मुत्सद्दी बाबींमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या हस्तक्षेपाबद्दल भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही वापरकर्त्यांनी या कंपन्यांची कार बुकिंग रद्द केल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी भाजप नेत्या साध्वी प्राची यांनी ह्युंदाईच्या या कृतीचे वर्णन ‘लज्जास्पद’ असे केले आहे.