रविवार, ऑक्टोबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पती-पत्नीत वाद नित्याचेच, पण या कारणांमुळे सध्या होतोय घटस्फोट

सप्टेंबर 18, 2022 | 5:24 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीचे नाते हे अत्यंत प्रेमाचे जिव्हाळ्याचे असते, खरे म्हणजे भारतीय संस्कृतीत लग्न तथा विवाह हा केवळ दोन जीवांचे मिलन नसून दोन कुटुंबांमधील कायमस्वरूपी निरंतर प्रेमाचे संबंध स्थापित करण्याचा एक मार्ग असतो असे म्हटले जाते, परंतु आजच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्याच्या वाढत्या चर्चा, तसेच एकमेकांविषयी वाढलेल्या अपेक्षा, ताणतणाव, कामाचा ताण, शारीरिक आणि मानसिक त्रास यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.

देशभरातील सर्वच राज्यात घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक असून या संदर्भातील वेगवेगळी कारणेही अत्यंत धक्कादायक अशी आहेत, उदाहरणार्थ पत्नी लवकर उठत नाही, चहा करून देत नाहीत, आई-वडिलांचे पाय पडत नाही, त्यांची सेवा करत नाही आणि त्यांना सांभाळत नाही. मुलांचा अभ्यास घेत नाही, अशी कारणे पतीकडून सांगितली जातात. तर पत्नीकडून देखील नवरा साडी घेऊन देत नाही, फिरायला घेऊन जात नाही, दागिने घेऊन देत नाही यासारखी कारणे सांगितले जातात.

खरे म्हणजे लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी एकमेकांमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी शेअर करणं गरजेचं असतं. जर का त्या लपून राहिल्या तर भविष्यात त्या समोर येऊन त्याचे वेगळे परिणाम नात्यावर होतात. गैरसमज वाढत जातात. यामध्ये शारीरिक व्याधी, आजार, सवयी, व्यसनं, लग्नापूर्वीच आयुष्य याबाबत सगळेजण गुप्तता ठेवतात. आणि त्याच गोष्टी लग्नानंतर समोर येऊन गैरसमज वाढत जातात. त्यासाठी पूर्वीपासूनच स्पष्टपणा असायला हवा. सगळं काही शेअर केलेल असावं.

वाद हा अनेक वेळा अनेक कारणांमुळे होतो. पण कधीकधी कारणाअभावी सुद्धा वाद होतो. यामध्ये चिडचिड, कामाचं टेन्शन, हे सगळं जर घरात निघालं तर वाद होतात. काम कामाच्या जागी अन घर घराच्या जागी असलं तर मग हे होत नाही. पण हे सर्वजण विसरतात. आणि यामुळे घरातल सुख हरवून जात आणि नात्यातला संवाद आणि आनंद संपतो. परिणामी वाद उभे राहतात. आणि हा वाद विकोपाला जाऊन नातं तुटण्यापर्यंत पोहचतो.

वास्तविक लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. पण त्या सुटायला किवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. घटस्फोटांची केवळ संख्याच वाढत नाही, तर त्यासाठी दिल्या जाणाऱ्या नित्याच्या कारणांतही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे.

पती पत्नीचेच नव्हे नातं कोणताही असला तरी त्यात सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे विश्वास. एकमेकांवर विश्वासच नसेल तर संशय निर्माण होतो. आणि हा संशय माणसाला आणि नात्याला पोखरून जातो. अनेक जोडपी विश्वास तुटल्याने विभक्त होतात. अनैतिक संबंध, व्यसन, खोटेपणा ह्यातून नात्यातली दरी वाढत जाते. नातं हे विश्वासाच्या बळावर उभ असत. आणि हा विश्वास प्रत्येक नात्यामध्ये असायलाच हवा.

आपल्याकडे कुठे थांबायला हवे याचीही माहिती नसते. बायकोला ही मत आहे आणि नवराही आपल्याला बोलू शकतो हे दोघांनाही कळायला हवं असत. पण प्रगल्भतेचा अभाव असल्याने हे होत नाही. आणि दोघांकडेही त्यातून वाद होतात. ही प्रगल्भता दोघांनीही आत्मसात करायला हवी. ती असेल तर अनेक गोष्टी समजून घ्यायला सोप्या जातात.

नात्यातली अपेक्षा ही कोणाकडे बघून असू नये. एखाद्याची श्रीमंती बघून आपलाही नवरा असा असावा असं म्हणून त्याच्याशी वाद करणं योग्य नाही. तर एखाद्याची सुंदर बायको बघून आपली बायको ही अशीच सुंदर असायला हवी असं म्हणून तिला दोष देणं योग्य नाही. अपेक्षा ही अवास्तव झाली की वाद होतोच. अशा अपेक्षा टाळायलाच हव्या.

गेल्या काही वर्षांत चित्रविचित्र कारणांमुळे झालेल्या घटस्फोटांची जंत्री एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. लग्नापूर्वीचे घर मोठे होते. लग्नानंतर लहान घरात राहावे लागत आहे. मोठ्या घरासाठी नवरा काहीच करत नाही या कारणास्तव देखील घटस्फोट झाला आहे. तसेच पत्नीचे वजन वाढले आणि तिचे शरीर बेढब दिसू लागले. अनेकवेळा सांगूनही तिने त्यासंदर्भात काहीच केले नाही त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगत एका पतीने काडीमोड घेतला.

दीड महिना सकाळचा पहिला चहा पत्नीने करून दिला नाही तसेच मित्र आल्यानंतर देखील चहा करण्यास नकार दिला, त्यामुळे अपमान झाला या कारणास्तव एका व्यक्तीने घटस्फोट घेतला.
आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव पत्नीच्या हाताला नाही. यामुळे जेवणाचा भ्रमनिरास होत असल्याचे सांगत एक जण पत्नीपासून विभक्त झाला.

पत्नीच्या गालावर अनेक पिंपल्स आहे. त्यामुळे मला मानसिक त्रास होतो. ती नकोशी वाटतेय, या कारणास्तव ही एकाचा घटस्फोट झाला आहे. करवाँ चौथला पतीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार न केल्यामुळे अनादर झाल्याच्या भावनेतून भांडण झाल्यानंतर एका पतीने घटस्फोट घेतला.

नवऱ्याला मी खूप आवडते आणि तो कधीच भांडत नाही. कधीच विरोध करत नाही. पत्नीचे सर्वच त्याला पटते, यामुळे वैताग होत असल्याच्या भावनेतून एक महिला पतीपासून विभक्त झाली. तर प्रेम विवाह केलेल्या एका मुलाने लग्नानंतर आपण मांसाहार करणार नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही त्याला मांसाहाराची इच्छा अनावर झाल्याने त्याने अनेक रात्री मित्रांकडे राहत मांसाहार केल्याचे पत्नीला समजले. पत्नीने फसवणूक झाल्याचे सांगत घटस्फोट घेतला. याशिवायही अनेक कारणे आहेत.

Husband Wife Divorce Reasons Survey Report

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे चाललंय काय!!!! शालेय विद्यार्थ्यांच्या अनुदानावरही GST; असे झाले उघड

Next Post

बाबा रामदेव यांच्या कंपनीने केला मोठा विक्रम; दिला तब्बल एवढा परतावा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

jail11
क्राईम डायरी

सहा तडिपारांचे शहरात वास्तव्य….पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑक्टोबर 5, 2025
IMG 20251004 WA0392 1
स्थानिक बातम्या

चांदवडच्या पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या अनुषंगाने असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑक्टोबर 5, 2025
IMG 20251004 WA0374
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक….मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

ऑक्टोबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, रविवार, ५ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 5, 2025
G2Z45ldXEAAahvP 1024x843 1
मुख्य बातमी

सरकारी भरतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

ऑक्टोबर 4, 2025
WhatsApp Image 2025 10 04 at 7.59.57 PM
संमिश्र वार्ता

अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ!

ऑक्टोबर 4, 2025
a2aea12c d247 44eb 8008 09e9f5556117
संमिश्र वार्ता

जळगाव जिल्ह्यात इतक्या तरुणांना मिळाली सरकारी नोकरी…

ऑक्टोबर 4, 2025
Gadkari5XD6X
संमिश्र वार्ता

नागपूर होणार या क्षेत्राचे राष्ट्रीय केंद्र

ऑक्टोबर 4, 2025
Next Post
baba ramdev e1679505148818

बाबा रामदेव यांच्या कंपनीने केला मोठा विक्रम; दिला तब्बल एवढा परतावा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011