शनिवार, ऑक्टोबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य टीप्स: मधुमेहाच्या रुग्णांनी ही ५ फळे खाऊ नयेत

जानेवारी 14, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मधुमेह हा गेल्या काही दशकांमध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे. काही आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार, अलिकडच्या दशकात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जगात विशेषतः भारतात झपाट्याने वाढली आहे. कमकुवत जीवनशैली आणि पौष्टिक आहाराचा अभाव हे या आजाराचे मुख्य कारण बनू पाहत आहेत. मधुमेहामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खालावते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जागतिक स्तरावर ४२२ दशलक्षांहून अधिक नागरिक या गंभीर आजाराचे रूग्ण बनले आहेत.

डब्ल्यूएचओच्या मते, मधुमेह या आजाराकडे सध्या जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून पाहिले जाऊ शकते. मधुमेह हा केवळ एक आजार नाही, तर इतर अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. लोकांना या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी, त्याबद्दल जनजागृती करणे महत्वाचे आहे. डायबिडीस म्हणजे मधुमेह हा असाध्य आजार असून तो अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे होतो.

वैद्यकीय भाषेत साखरेचे प्रमाण वाढणे याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. आजच्या काळात, चुकीचा आहार, अव्यवस्थित जीवनशैली आणि कोणतीही शारीरिक क्रिया न करणे यामुळे लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडतात. मधुमेह हा असा आजार आहे की त्यावर कोणताही इलाज नाही, तो फक्त आटोक्यात आणता येतो, हा आजार आजकाल लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच होत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खाण्यापूर्वी काही विचार करणे महत्वाचे आहे, कारण आपण प्रत्येक फळ अमर्यादित प्रमाणात खाऊ शकत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीकडे लक्ष दिल्यास या आजारावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते. तसेच रुग्णांना काही फळे खाण्याची परवानगी आहे, ज्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि कमी नैसर्गिक साखर आहे.

कारण अशा फायबरने युक्त फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. परंतु काही फळे अशी देखील आहेत जी रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. जर कोणाला मधुमेह असेल तर केळी, चिकू, आंबा, द्राक्षे, अननस आणि टरबूज ही फळे खाणे टाळावे. मधुमेहासाठी धोकादायक ठरणाऱ्या फळांबद्दल जाणून घेऊ या…

द्राक्षे
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही खूप जास्त असते. एक कप द्राक्षांमध्ये सुमारे २३ ग्रॅम साखर असते, त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वीही मधुमेही रुग्णांनी विचार करून या फळाचे सेवन फार कमी प्रमाणात करावे.

लिची
लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याची गणना जास्त साखर असलेल्या फळांमध्ये केली जाते. त्यामुळे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी लिची न खाल्ल्यास उत्तम.

आंबा
फळांचा राजा असून यंदा काही ठिकाणी जानेवारी -फेब्रुवारीतच आंब्याची विक्री चालू हंगामात वाढली आहे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते, असे तज्ज्ञांचे मत असले तरी त्यांच्या मते १०० ग्रॅम आंब्यामध्ये १४ ग्रॅम साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते.

अननस
ताज्या अननसाच्या अतिसेवनाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्याचे सेवन टाळावे. ज्यांना अननसाचा ज्यूस प्यायला आवडतो, त्यांनी अननसाचा ज्यूस फळापेक्षाही मधुमेहास घातक ठरू शकतो, हे लक्षात ठेवावे.

केळी
केळीमध्ये जीवनसत्त्वे ते फायबर आणि पोटॅशियमसह अनेक खनिजे असतात, परंतु केळीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनीही केळी खाणे टाळावे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमर प्रेम! रेखाने शेवटच्या श्वासापर्यंत विनोद मेहरा यांना सोडले नाही

Next Post

आज आहे मकर संक्रांत; असा आहे मुहूर्त आणि महत्त्व

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
makar sankrant

आज आहे मकर संक्रांत; असा आहे मुहूर्त आणि महत्त्व

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011