सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य टीप्स: मधुमेहाच्या रुग्णांनी ही ५ फळे खाऊ नयेत

by Gautam Sancheti
जानेवारी 14, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मधुमेह हा गेल्या काही दशकांमध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे. काही आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार, अलिकडच्या दशकात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जगात विशेषतः भारतात झपाट्याने वाढली आहे. कमकुवत जीवनशैली आणि पौष्टिक आहाराचा अभाव हे या आजाराचे मुख्य कारण बनू पाहत आहेत. मधुमेहामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खालावते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जागतिक स्तरावर ४२२ दशलक्षांहून अधिक नागरिक या गंभीर आजाराचे रूग्ण बनले आहेत.

डब्ल्यूएचओच्या मते, मधुमेह या आजाराकडे सध्या जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून पाहिले जाऊ शकते. मधुमेह हा केवळ एक आजार नाही, तर इतर अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. लोकांना या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी, त्याबद्दल जनजागृती करणे महत्वाचे आहे. डायबिडीस म्हणजे मधुमेह हा असाध्य आजार असून तो अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे होतो.

वैद्यकीय भाषेत साखरेचे प्रमाण वाढणे याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. आजच्या काळात, चुकीचा आहार, अव्यवस्थित जीवनशैली आणि कोणतीही शारीरिक क्रिया न करणे यामुळे लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडतात. मधुमेह हा असा आजार आहे की त्यावर कोणताही इलाज नाही, तो फक्त आटोक्यात आणता येतो, हा आजार आजकाल लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच होत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खाण्यापूर्वी काही विचार करणे महत्वाचे आहे, कारण आपण प्रत्येक फळ अमर्यादित प्रमाणात खाऊ शकत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीकडे लक्ष दिल्यास या आजारावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते. तसेच रुग्णांना काही फळे खाण्याची परवानगी आहे, ज्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि कमी नैसर्गिक साखर आहे.

कारण अशा फायबरने युक्त फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. परंतु काही फळे अशी देखील आहेत जी रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. जर कोणाला मधुमेह असेल तर केळी, चिकू, आंबा, द्राक्षे, अननस आणि टरबूज ही फळे खाणे टाळावे. मधुमेहासाठी धोकादायक ठरणाऱ्या फळांबद्दल जाणून घेऊ या…

द्राक्षे
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही खूप जास्त असते. एक कप द्राक्षांमध्ये सुमारे २३ ग्रॅम साखर असते, त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वीही मधुमेही रुग्णांनी विचार करून या फळाचे सेवन फार कमी प्रमाणात करावे.

लिची
लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याची गणना जास्त साखर असलेल्या फळांमध्ये केली जाते. त्यामुळे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी लिची न खाल्ल्यास उत्तम.

आंबा
फळांचा राजा असून यंदा काही ठिकाणी जानेवारी -फेब्रुवारीतच आंब्याची विक्री चालू हंगामात वाढली आहे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते, असे तज्ज्ञांचे मत असले तरी त्यांच्या मते १०० ग्रॅम आंब्यामध्ये १४ ग्रॅम साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते.

अननस
ताज्या अननसाच्या अतिसेवनाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्याचे सेवन टाळावे. ज्यांना अननसाचा ज्यूस प्यायला आवडतो, त्यांनी अननसाचा ज्यूस फळापेक्षाही मधुमेहास घातक ठरू शकतो, हे लक्षात ठेवावे.

केळी
केळीमध्ये जीवनसत्त्वे ते फायबर आणि पोटॅशियमसह अनेक खनिजे असतात, परंतु केळीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनीही केळी खाणे टाळावे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमर प्रेम! रेखाने शेवटच्या श्वासापर्यंत विनोद मेहरा यांना सोडले नाही

Next Post

आज आहे मकर संक्रांत; असा आहे मुहूर्त आणि महत्त्व

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
Next Post
makar sankrant

आज आहे मकर संक्रांत; असा आहे मुहूर्त आणि महत्त्व

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011