शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आरोग्य टीप्स: दररोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करावी की नाही? काय आहेत त्याचे फायदे, तोटे?

by India Darpan
सप्टेंबर 19, 2022 | 5:38 am
in राष्ट्रीय
0
Bathing

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसाधारणपणे सकाळी अंघोळ केली जाते. मात्र, काही जण दररोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी करणे आणि चांगली झोप घेण्यात मदत मिळते. संशोधक सुद्धा रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. कारण रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी लाभ होतात. सायंकाळी स्नान केल्याने शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी ९० मिनिटे अगोदर गरम पाण्याने आंघोळ केल्याने सामन्यपेक्षा जवळपास १० मिनिटे लवकर झोप येते. कारण गरम पाणी शरीराचे तापमान थोडे कमी करते, यामुळे शरीराला संकेत मिळतो की, झोपण्याची वेळ झाली आहे.

दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण ताजेतवाने होऊन दिवसभराच्या कामाला सामोरे जाण्यास सज्ज होतो. सकाळची अंघोळ महत्वाची आहेच, पण रात्री झोपण्यापूर्वी थंड अथवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. यामुळे अनेक आरोग समस्यांना दूर ठेवता येते. रात्री थंड अथवा गरम पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत.

रात्री अंघोळीमुळे चांगली झोप येते. दिवसभरातील थकवा दूर होतो. अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. शांतीचा अनुभव येतो. थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते. थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन आणि चरबी कमी होते. जर पिंपल्सची समस्या असेल तर रात्री थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. केस चांगले होतात. त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र उघडतात.

थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. रक्त पुरवठा चांगला होतो. व्हाईट सेल्स वाढतात. तसेच थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो. मेंदूला थंड होतो. शारीरिक सौंदर्य टिकून राहते. दिवसभर काम केल्यानंतर तुमच्या मासपेशींमध्ये वेदना जाणवत असतील तर गरम पाण्याने आंघोळ करण्याने वेदना दूर करण्यात मदत मिळते. तर गरम पाणी शरीरावर पडताच, ते मांसपेशींचा तणाव दूर करते आणि चांगल्या झोपेला प्रोत्साहन देण्यास मदत करते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने रात्री पायात होणार्‍या वेदना रोखता येऊ शकतात.

काहींना सकाळी अंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तर काही जण वेळ मिळेल तेव्हा अंघोळ करतात. बऱ्याच जणांना रात्री आंघोळ करायची सवय असते. दिवसभर कामानंतर कोणत्याही व्यक्तीला रात्रीच्या वेळी जास्त थकवा किंवा सुस्ती जाणवते, यामुळेच डॉक्टर अशा लोकांना रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केली तर दिवसभर शरीरावर लागलेली धूळ आणि माती देखील निघून जाते. यासोबतच त्वचेचा रंग उजळतो. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने व्यक्तीचा मूडही सुधारतो आणि डोक्यात नवीन आणि चांगले विचार येतात.

रात्री अंघोळ करावी की नाही हे हवामानावर अवलंबून असते. जर खूप थंडी असेल तर रात्री अंघोळ केल्याने त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये, यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. रात्री अंघोळ करावी की करू नये, याबद्दल कोणताही नियम नाही. फक्त रात्री अंघोळ करण्यापूर्वी पाण्याचे तापमान आणि हवामान या दोन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर तिने रात्री अंघोळ करणे टाळावे.

Health Tips Daily Night Bath Useful or Not
Bathing

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठवाडा मुक्ती गाथा: सशस्त्र लढ्याला परवानगी कशी दिली?

Next Post

मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच क्षणाला अकाऊंटमधून १६ लाख गेले; कसं काय? वाचा सविस्तर

Next Post
mobile charging

मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच क्षणाला अकाऊंटमधून १६ लाख गेले; कसं काय? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011