गुरूवार, ऑक्टोबर 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य टीप्स: दररोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करावी की नाही? काय आहेत त्याचे फायदे, तोटे?

सप्टेंबर 19, 2022 | 5:38 am
in राष्ट्रीय
0
Bathing

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसाधारणपणे सकाळी अंघोळ केली जाते. मात्र, काही जण दररोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी करणे आणि चांगली झोप घेण्यात मदत मिळते. संशोधक सुद्धा रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. कारण रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी लाभ होतात. सायंकाळी स्नान केल्याने शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी ९० मिनिटे अगोदर गरम पाण्याने आंघोळ केल्याने सामन्यपेक्षा जवळपास १० मिनिटे लवकर झोप येते. कारण गरम पाणी शरीराचे तापमान थोडे कमी करते, यामुळे शरीराला संकेत मिळतो की, झोपण्याची वेळ झाली आहे.

दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण ताजेतवाने होऊन दिवसभराच्या कामाला सामोरे जाण्यास सज्ज होतो. सकाळची अंघोळ महत्वाची आहेच, पण रात्री झोपण्यापूर्वी थंड अथवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. यामुळे अनेक आरोग समस्यांना दूर ठेवता येते. रात्री थंड अथवा गरम पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत.

रात्री अंघोळीमुळे चांगली झोप येते. दिवसभरातील थकवा दूर होतो. अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. शांतीचा अनुभव येतो. थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते. थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन आणि चरबी कमी होते. जर पिंपल्सची समस्या असेल तर रात्री थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. केस चांगले होतात. त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र उघडतात.

थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. रक्त पुरवठा चांगला होतो. व्हाईट सेल्स वाढतात. तसेच थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो. मेंदूला थंड होतो. शारीरिक सौंदर्य टिकून राहते. दिवसभर काम केल्यानंतर तुमच्या मासपेशींमध्ये वेदना जाणवत असतील तर गरम पाण्याने आंघोळ करण्याने वेदना दूर करण्यात मदत मिळते. तर गरम पाणी शरीरावर पडताच, ते मांसपेशींचा तणाव दूर करते आणि चांगल्या झोपेला प्रोत्साहन देण्यास मदत करते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने रात्री पायात होणार्‍या वेदना रोखता येऊ शकतात.

काहींना सकाळी अंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तर काही जण वेळ मिळेल तेव्हा अंघोळ करतात. बऱ्याच जणांना रात्री आंघोळ करायची सवय असते. दिवसभर कामानंतर कोणत्याही व्यक्तीला रात्रीच्या वेळी जास्त थकवा किंवा सुस्ती जाणवते, यामुळेच डॉक्टर अशा लोकांना रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केली तर दिवसभर शरीरावर लागलेली धूळ आणि माती देखील निघून जाते. यासोबतच त्वचेचा रंग उजळतो. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने व्यक्तीचा मूडही सुधारतो आणि डोक्यात नवीन आणि चांगले विचार येतात.

रात्री अंघोळ करावी की नाही हे हवामानावर अवलंबून असते. जर खूप थंडी असेल तर रात्री अंघोळ केल्याने त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये, यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. रात्री अंघोळ करावी की करू नये, याबद्दल कोणताही नियम नाही. फक्त रात्री अंघोळ करण्यापूर्वी पाण्याचे तापमान आणि हवामान या दोन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर तिने रात्री अंघोळ करणे टाळावे.

Health Tips Daily Night Bath Useful or Not
Bathing

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठवाडा मुक्ती गाथा: सशस्त्र लढ्याला परवानगी कशी दिली?

Next Post

मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच क्षणाला अकाऊंटमधून १६ लाख गेले; कसं काय? वाचा सविस्तर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
mobile charging

मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच क्षणाला अकाऊंटमधून १६ लाख गेले; कसं काय? वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011