नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसाधारणपणे सकाळी अंघोळ केली जाते. मात्र, काही जण दररोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी करणे आणि चांगली झोप घेण्यात मदत मिळते. संशोधक सुद्धा रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. कारण रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी लाभ होतात. सायंकाळी स्नान केल्याने शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी ९० मिनिटे अगोदर गरम पाण्याने आंघोळ केल्याने सामन्यपेक्षा जवळपास १० मिनिटे लवकर झोप येते. कारण गरम पाणी शरीराचे तापमान थोडे कमी करते, यामुळे शरीराला संकेत मिळतो की, झोपण्याची वेळ झाली आहे.
दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण ताजेतवाने होऊन दिवसभराच्या कामाला सामोरे जाण्यास सज्ज होतो. सकाळची अंघोळ महत्वाची आहेच, पण रात्री झोपण्यापूर्वी थंड अथवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. यामुळे अनेक आरोग समस्यांना दूर ठेवता येते. रात्री थंड अथवा गरम पाण्याने अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत.
रात्री अंघोळीमुळे चांगली झोप येते. दिवसभरातील थकवा दूर होतो. अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. शांतीचा अनुभव येतो. थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते. थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन आणि चरबी कमी होते. जर पिंपल्सची समस्या असेल तर रात्री थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. त्यामुळे पिंपल्स होत नाहीत. केस चांगले होतात. त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र उघडतात.
थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते. रक्त पुरवठा चांगला होतो. व्हाईट सेल्स वाढतात. तसेच थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो. मेंदूला थंड होतो. शारीरिक सौंदर्य टिकून राहते. दिवसभर काम केल्यानंतर तुमच्या मासपेशींमध्ये वेदना जाणवत असतील तर गरम पाण्याने आंघोळ करण्याने वेदना दूर करण्यात मदत मिळते. तर गरम पाणी शरीरावर पडताच, ते मांसपेशींचा तणाव दूर करते आणि चांगल्या झोपेला प्रोत्साहन देण्यास मदत करते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने रात्री पायात होणार्या वेदना रोखता येऊ शकतात.
काहींना सकाळी अंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तर काही जण वेळ मिळेल तेव्हा अंघोळ करतात. बऱ्याच जणांना रात्री आंघोळ करायची सवय असते. दिवसभर कामानंतर कोणत्याही व्यक्तीला रात्रीच्या वेळी जास्त थकवा किंवा सुस्ती जाणवते, यामुळेच डॉक्टर अशा लोकांना रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केली तर दिवसभर शरीरावर लागलेली धूळ आणि माती देखील निघून जाते. यासोबतच त्वचेचा रंग उजळतो. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने व्यक्तीचा मूडही सुधारतो आणि डोक्यात नवीन आणि चांगले विचार येतात.
रात्री अंघोळ करावी की नाही हे हवामानावर अवलंबून असते. जर खूप थंडी असेल तर रात्री अंघोळ केल्याने त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये, यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. रात्री अंघोळ करावी की करू नये, याबद्दल कोणताही नियम नाही. फक्त रात्री अंघोळ करण्यापूर्वी पाण्याचे तापमान आणि हवामान या दोन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर तिने रात्री अंघोळ करणे टाळावे.
Health Tips Daily Night Bath Useful or Not
Bathing