निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गत ८ महिने भावाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदा आता चाळीतच सडू लागला आहे. रस्त्याच्या दुर्तफा फेकलेला या कांद्याचा आता उग्र वास येऊ लागल्याने रस्त्याने सर्वीकडे सडलेल्या कांद्याचे ढीग दिसू लागले आहेत. दोन पैसे मिळतील या अपेक्षेने ठेवलेला कांदा सडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही या वर्षी निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार कांद्यावर बोलायला तैयार नसल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झालेला दिसतो आहे.
एकीकडे भरमसाठ झालेला पावसामुळे लालकांदा ही पिकलेला नसतांना आहे तो उन्हाळी कांदा मातीमोल विकला जात आहे. परकीय देशात कांदा पाठविण्याची तरतूद सरकारने ज्या पद्धतीने केली पाहिजे त्या पद्धतीने नियोजन होत नसल्याने आहे. त्या कांद्यामुळे भारतीय बाजारपेठेत कांद्याची आवक आज ही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आज ही कांदा दर सरासरी सोडायला तैयार नाही तर दुसरीकडे आगामी रब्बी हंगामाची तैयारी बळीराजा करू लागला असला तरी अजून ही पावसाची उघडीप नसल्याने उन्हाळी कांदा लागवड याही हंगामात लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांदा उत्पादन झाल्याने आणि आता शेतकरी वर्गाकडे साठवणुकीची साधने असल्याने कांदा साठवणूकिचे प्रमाण हे दरवर्षी वाढतच आहे. मात्र त्या तुलनेत सरकार कडुन कांद्याचे उत्पादन आणि मागणी याचा समतोल राखला जात नसल्यानेच कांदा उत्पादक शेतकरी गेली दोन तीन वर्षे भाववाढीपासून वंचित राहिला आहे.पिकविनारा पेक्षा खाणारा वर्ग अधिक असल्याने सरकार नेहमी ग्राहक हिताच्या बाजूने राहिल्यानेच कांदा उत्पादक शेतकरी भरडला जातो आहे. ज्या राष्ट्रांमध्ये कांदा निर्यात खुली करून कांदा निर्यातीचे प्रमाण वाढविले पाहिजे तिथे मात्र तसे होत नसल्याने शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा सडून उकिरड्यावर जातो आहे.
एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी सरकार कांदा अनुदान देईल किंवा भाववाढी साठी प्रयत्न करेल यासाठी आंदोलने करीत रस्त्यावर उतरत असताना कांद्याच्या विषयावर ना लोकप्रतिनिधी जागरूकता दाखवतात ना सरकार अश्या परिस्थितीत सरकारी बँका, सोसायटी, जिल्हा बँक शेतकरी कडे असलेल्या कर्ज वसुलीसाठी धडक बेधडक कार्यवाही करतांना दिसून येत आहे. आगामी काळात ही शेतकरी कांदा पिकवतच राहील साठवणुकीची साधने दिवसेगणिक वाढतच राहतील मात्र या पिकलेल्या कांद्याचे नियोजन सरकार कधी करणार याची आर्त हाक आता बळीराजा देऊ लागला आहे .सरकारची कांद्या बद्दल असलेली भावना बदलणे गरजेचे आहे.
कांदा निर्यात धोरण बदलले गेले पाहिजे, कांद्याला अनुदान दिले गेले पाहिजे कधी काळी नाशिक जिल्ह्याच्या जमीनीत पिकणारा कांदा आता देशातील अन्य राज्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात पिकत असल्याने कांद्याला हमी भाव दिला गेला पाहिजे अशी ही मागणी शेतकरी वर्गाकडून होत असली तरी या वर्षी निसर्गाशी दोन हात करून पिकविलेला उन्हाळ कांदा आता मात्र चाळीतच सडत असल्याने हजारो टन कांदा उकीरड्यावर जात असला तरी भाववाढ होताना दिसून येत नाही. ज्या शेतकऱ्यांनाकडे थोड्या फार प्रमानात कांदा शिल्लक आहे ते भाव वाढीच्या अपेक्षेने कांदा सांभाळून आहेत मात्र रोजच्या बदलत्या हवामाणुळे आहे तो कांदा रोजच घट होऊन सडत आहे.
Ground Report Onion Issue Farmer Trouble