नवी दिल्ली – कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कर्मचार्यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी अहमदाबाद, फरिदाबाद, हैदराबाद आणि कोलकाताच्या ईएसआय रुग्णालयात प्रायोगित तत्वावर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या ४० वर्ष आणि त्याहून अधिक वय असेलेले विमा उतरवलेले सदस्य याच्या कक्षेत आहेत.
तसेच ईएसआयसीच्या १८६ व्या बैठकीत गुरुग्राम (मानेसर) मध्ये सध्या १०० खाटांच्या रुग्णालयांचा विस्तार करून ५०० खाटांचे ईएसआयसी रुग्णालयांच्या उभारणीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, आम्ही प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प सुरू केला आहे. त्याअंतर्गत आम्ही प्रत्येक वर्षी ४० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ईएसआयसीच्या विमा उतरवलेल्या व्यक्तींना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. आरोग्यदायी भारत आमचे स्वप्न आहे. आमच्याकडे ३.५ कोटी सदस्य आहेत. त्यामुळे उपाचारासह ईएसआयसीमध्ये देखभाल कार्यक्रम चावलला तर आम्ही आरोग्यदायी भारताचे स्वप्न प्राप्त करू शकतो. यादव म्हणाले, आगामी काळात सामाजिक सुरक्षा संहिता कार्यान्वित करण्यासह सदस्यांची संख्या वाढून पाच कोटी होणार आहे. त्यामुळे या योजनेचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे.