बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2022 | 11:40 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
suprime court

 

इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या असून या निवडणुका कधी होणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असणार आहे. १० नोव्हेंबरच्या आसपास सर्वोच्च न्यायालयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या विविध याचिकांवर सुनावणी होणार आहे.

राज्यभरातील महापालिकांच्या प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली होती. इतर महापालिकांच्या प्रभागांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा हा निर्णय बदलून २०१७ ला झालेल्या निवडणुकीतील म्हणजेच जुनी प्रभाग संख्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर रखडलेल्या या निवडणुका राज्य निवडणूक आयोग तातडीने जाहीर करू शकतो. मात्र ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करून शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय न्यायालयाने मान्य केला तर मात्र निवडणूक आयोगाला या निवडणुकांची तयारी करण्यासाठी ४ महिन्यांचा वेळ जाऊ शकतो.

सध्या राज्यातील नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार या महापालिकांचा कारभार गेल्या २ वर्षाहून अधिक काळ प्रशासक सांभाळत आहेत. तर मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, सोलापूर, उल्हासनगर या दहा महापालिकांवर मागील आठ महिन्यांपासून प्रशासक आहे. त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. त्यामुळे साहजिकच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

शिंदे – फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यातील मुंबईतील प्रभाग रचनेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देऊन त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उर्वरित महापालिकांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जोधपूर हवाई तळावर ‘गरूड- VII’ सराव

Next Post

धुळे जिल्ह्यात आमदार निधीबाबत झाला हा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
dhule 1140x570 1 e1667025702373

धुळे जिल्ह्यात आमदार निधीबाबत झाला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011