मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्याने राज्यभरात शिवसेनेविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांचे नेतेही एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. हे पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नेत्यांना तंबी दिली आहे. “कोणीही कायदा हातात घेऊ नये”, असे त्यांनी बजावले आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. यामुळे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा त्याचबरोबरच शिवसेना पक्षाच्या नावाचादेखील वापर करता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. त्यातच आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. तर अनेक ठिकाणी नेते झालेले पहायला मिळत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नका असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना तंबी दिली आहे.
सरकारला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे कान टोचले आहेत. टीकेला टिकेने उत्तर देण्याची गरज नसल्याचा सल्ला ही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिला आहे. तसेच सरकारने १०० दिवसात केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेले असले तरीदेखील मतदार संघातील कामे होत नसल्याचे म्हणत कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवावर भडकल्याचे समोर आले. या मुद्द्यावरुनदेखील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Eknath Shinde to Minister’s and MLA’s Politics