पुणे – गावरानी किंवा देशी तूप आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी मानले जाते. त्यामुळेच रोज एक चमचा देशी तूप खाणे फायदेशीर असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. देशी तूप जेवणाला चवदार तर बनवतेच पण पौष्टिकतेनेही परिपूर्ण बनते. डाळ, रोटी किंवा पराठा असो, देसी तूप प्रत्येक पदार्थाची चव वाढवते. तुप खल्ल्याने वजन वाढेल, या विचाराने अनेक जण देसी तुपाचे सेवन करत नाहीत, पण देशी तूप भरपूर फायदेशीर आहे. त्यात भरपूर पोषक तत्व असल्याने देशी तूप हे प्रथिने, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे ए, ई आणि के यांचा उत्तम स्रोत आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी
देशी तूप हे त्वचा, केस, पचन संस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. आपण बाजारात दोन प्रकारचे तूप पाहिले असेल, एकाचा रंग पांढरा आणि दुसरा रंग पिवळा असतो. अशा वेळी प्रश्न पडतो की, पांढरे की पिवळे, कोणते देशी तूप जास्त आरोग्यदायी आहे? मात्र प्रथम हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, पांढरे तूप म्हशीच्या दुधापासून बनते, पिवळे तूप गाईच्या दुधापासून बनवले जाते.
पांढऱ्या तुपाची वैशिष्ट्ये
पांढर्या तुपामध्ये पिवळ्या तुपापेक्षा कमी फॅट असते. त्यात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते दीर्घकाळ टिकवून ठेवता येते. हे मजबूत हाडे राखण्यास, वजन वाढविण्यात आणि हृदयाच्या स्नायूची क्रिया वाढविण्यात मदत करते. म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या घटकांनी समृद्ध आहे.
पिवळ्या तुपाची वैशिष्ट्ये
गाईचे तूप वजन कमी करण्यासाठी चांगले आहे, ते प्रौढ आणि मुलांमधील लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते आणि सहज पचते. गाईच्या दुधात A2 प्रोटीन असते, ते म्हशीच्या दुधात नसते. गाईच्या तूपात प्रथिने, खनिजे, कॅल्शियम, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच गाईचे तूप हृदयाला चांगले कार्य करण्यास मदत करते, तसेच रक्तातील धोकादायक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
कोणते तूप आरोग्यदायी
दोन्ही प्रकारचे तूप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्यामध्ये समान प्रमाणात चरबी असते. म्हशीच्या तुपापेक्षा गाईचे तूप चांगले मानले जाते. गाईचे तूप श्रेयस्कर आहे कारण त्यात कॅरोटीन व्हिटॅमिन ए असते, ते डोळा आणि मेंदूच्या कार्यासाठी चांगले असते. तसेच हे तूप पचनासाठी चांगले असून त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. गाईच्या तुपापेक्षा म्हशीच्या दुधात जास्त फॅट आणि कॅलरीज असतात. तसेच सर्दी, खोकला आणि कफ आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.