निलेश गौतम, डांगसौंदाणे (सटाणा)
येथील जनता विद्यालयात तब्बल 22 वर्षांनी इयता 10वी च्या वर्गाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. 1999-2000 च्या तुकडीचा हा स्नेहमेळावा शाळेच्या इतिहासातील पहिलाच मेळावा ठरल्याने गाव व पंचक्रोशत हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. तब्बल 22 वर्षांनी तत्कालीन वर्ग मित्र व मैत्रिणी एकत्र आल्या तर तत्कालीन सर्व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
65 माजी विद्यार्थी आणि 18 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नव्या-जुन्या आठवणींसह एक स्तुत्य उपक्रम ठरला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य पी डी पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन प्राचार्य आर एम शिवदे, जी एन.बोरसे, जी व्ही आहेर, एस ए पगार, बी एच पवार, आर के भामरे, एच टी पगार, एस वाय कापडणीस, आर.व्ही आहेर, आर एम मोरे , जे बी ठाणगे, सतीश भरती काका सुलक्षण, बाळुसिंग परदेशी हे होते.
सकाळी 10 वाजता सुरुवात झालेल्या या स्नेहमेळाव्याची सांगता दुपारी 4 वाजता झाली. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केल्याने उपस्थित सर्व मागच्या 22 वर्ष जुन्या इतिहासात गेल्याने तत्कालीन शिक्षक विद्यार्थी मध्ये एक उत्साह पुर्वक वातावरण निर्मिती झाली होती. स्नेहमेळाव्याला तत्कालीन हजेरी पुस्तकाप्रमाणे 88 विद्यार्थी, विद्यार्थिनी मधून तब्बल 65 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहिल्याने ही उपस्थिती लक्षणीय ठरली.
या कार्यक्रमात पुणे, बडोदा, जळगाव, सिंधुदुर्ग, रायगड व अन्य ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमास सचिन आहिरे, जयंत आहिरे, राकेश सोनवणे, संदीप बधान, सफल सोनवणे, तुषार देशमुख, प्रदीप सोनवणे, दीपक सोनवणे ,जीवन बैरागी, सचिन सोनवणे, रतीलाल गांगुर्डे, शरद गायकवाड, नाना देशमुख, सोमनाथ साबळे, दीपक पवार,सुदाम बैरागी समाधान व्यवहारे, दिनेश सोनवणे,शांताराम गायकवाड, आत्माराम सोनवणे, नंदन देशमुख,सोमनाथ बागुल गोपाल ह्याळींज, प्रमिला वाघ, दर्शना पगारे, जोत्स्ना सोनवणे, कविता बिरारी, दिपीका नाहिरे, मंगला सोनवणे, रंजना सोनवणे, धनश्री बैरागी, संगीता काकुळते, पूनम वाघ, रत्ना निकम, सुरेखा वाघ,जयश्री सोनवणे, आदी विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रसातविक निलेश गौतम यांनी केले तर सुत्रसंचलन दीपक जगताप व पल्लवी सोनवणे यांनी केले
कार्यक्रमातील प्रमुख विशेष
– तत्कालीन वर्ग मित्र बाबूलाल जगताप हा अपंग विद्यार्थी गरीब असल्याने त्याला सर्व वर्गमित्रांनी ड्रेस भेट देत त्याच्याबद्दल असलेली मित्रत्वाची भावना जोपासली.
– आलेल्या सर्व माहेरवाशीण असलेल्या तत्कालीन वर्ग मैत्रणींना गावाची व शाळेची आठवण म्हणुन निलेश गौतम यांनी वयक्तिक रित्या समई भेट देत आदरभाव व्यक्त केला.