अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिंदे-फडणवीस सरकार मध्ये कॅबिनेट पदी वर्णी लागल्यानंतर मंत्री दादा भुसे प्रथमच आपल्या मतदार संघात रात्री उशिरा पोहचले. त्यानंतर त्यांनी सकाळी मतदार संघातील पावसामुळे नुकसान झालेल्या गावांच्या पाहणी केली. यावेली रस्त्यात अनेकांनी त्यांचे स्वागत केले. मालेगाव तालुक्यातील काटवन भागातील काजवाडे, पोहाने या गावांचा दौरा करत पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक शेतात पाणी साचलेले दिसले. यावेळी त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कॅबिनेट मध्ये झालेल्या निर्णय नुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.