ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोंबविलीतील एका पतसंस्थेतून तब्बल १३ लाखांचे दागिने लांबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहुतांश ग्राहक हे पतपेढ्यांमध्ये दागिने ठेवतात. मात्र, या घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातवरण तार झाले आहे. मात्र, पतसंस्थेतील कर्मचाऱ्यानेच हे दागिने लांबविल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
आपण कष्ट करून साठवलेले पैसे सुरक्षित राहावे म्हणून अनेक जण शासकीय आणि खासगी बँकांमध्ये खाते उघडून ही रक्कम जमा करतात, त्याचप्रमाणे आजच्या काळात चोरांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अनेक महिला व पुरुष आपले दागिने देखील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. साहजिकच लॉकरमध्ये दागिने सुरक्षित असल्याने चोरीची काळजी नसते. परंतु तरी काही वेळा त्याची चोरी येऊ शकते, मात्र त्या संदर्भातली भरपाई नुकसान भरपाई मिळते, इतकेच नव्हे तर काहीजण पतपेढीमध्ये देखील आपली रक्कम किंवा दागिने ठेवतात. पतपेढीत ठेवीच्या रक्कमेवर व्याजदर चांगला मिळतो. तसेच काही पतपेढींनी दागिने लोकरची सुविधा केलेली आहे. त्यासाठी कमी चार्जेस असल्याने तेथे दागिने ठेवतात, मात्र हे दागिने सुरक्षित राहतील का याची खात्री नसते, तरीही काहीजण असे धाडस करतात.
डोंबिवलीतील एका पिढीमध्ये अशाच प्रकारे दागिन्यांची भर दिवसा चोरी झाली विशेष म्हणजे हे दागिने या पतपेढीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांनी चोरले. यामुळे डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली असून या चोरी प्रकरणाची चर्चा सुरू आहे त्यामुळे पीडित दागिने आणि पैसे ठेवायचे नाही? याबद्दल नागरिकांमध्ये संशय आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवलीमध्ये एका पतपेढीमध्ये काम करणाऱ्या एका महिला क्लर्कनेच पतपेढी मधील तेरा लाखांचे सोने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतपेढीने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आरोपी महिलेकडून चोरलेले तेरा लाखांचे दागिने हस्तगत केले. दुपारी पतपेढीत कुणी नसल्याची संधी साधत तब्बल तेरा लाख रुपयांचे सोने लंपास करण्याचे वाईट धाडस या महिलेच्या अंगाशी आले. या प्रकरणी आरोपी महिलेसह एका सोनाराला अटक करण्यात आली आहे.
वास्तविक बँकेमध्ये पैसे ठेवण्यासोबत अनेकजण सोनेदेखील त्यानंतर आता सोने ठेवण्याबाबतही असुरक्षितता निर्माण होऊ लागलीय. कारण आता चक्क पतपेढीमध्ये ठेवण्यात आलेले दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गोपाळ नगर परिसरात आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमधून सुमारे १३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच पतपेढी तर्फे याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. ही चोरी पतपेढीमध्येच काम करत असलेल्या एका महिला क्लार्कने केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या महिलेने आपण काहीही केले नसल्याचा कांगावा केला मात्र या महीलेला पोलिसी खाक्या दाखवताच तिने चोरी केल्याचे कबूल केले. प्रथम या महिलेने पतपेढीत कुणी नसताना लॉकरची चावी चोरली. त्या नंतर चावीच्या साह्याने लॉकर उघडून दागिने चोरले. यानंतर हे दागिने तिने एका सोनाराला विकले होते. पोलिसांनी या प्रकरणी या महिलेला अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहरातील चोरीच्या या घटनेमुळे आता पतपेढीत दागिने ठेवणेही कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच चार महिन्यापूर्वी शहरात भरदिवसा ज्वेलर्सचे दुकान फोडून तब्बल ३ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असतानाच पतपेढीचे कार्यालय फोडून चोरटयांनी दोन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी डोंबिवलीत घडली आहे होती कार्यालयातील दोन लाखांची रोकड, संगणक, मोबाइल असा मुद्देमाल चोरटयांनी पळवला होता.
Crime Patasanstha Gold Theft Locker