शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन – ‘थॉमस चषक’ विजेतेपदाचं लख्ख यश

by India Darpan
मे 22, 2022 | 8:20 pm
in इतर
0
FSyjmaOUUAEDdj2

 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
‘थॉमस चषक’ विजेतेपदाचं लख्ख यश

– जगदीश देवरे (इ मेल- pavilionsmailbox@rediffmail.com)
तुम्ही क्रिकेटचा विश्वचषक बघितलाय, फुटबॉलचा विश्वचषक बघितलाय. बॅडमिंटनचा विश्वचषक अशी स्पर्धा अजून जरी खेळली जात नसली तरी बॅडमिंटनच्या इतिहासात ‘थॉमस चषक’ या स्पर्धेला विश्वचषकाइतकेच महत्व आहे. गेल्या ७३ वर्षाच्या या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सहा देशांनी मिळूनच सगळी विजेतेपदं जिंकून घेतलेली असली तरी यंदा मात्र भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास निर्माण करून या स्पर्धेच्या इतिहासातले पहिले वहिले विजेतेपद मिळविले आहे.

या अदभूत अशा यशानंतर बॅडमिंटन खेळणाऱ्या अनेक दिग्गज देशांच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्की. याआधी १९५२, १९५५ आणि १९७९ या तीन थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत भारतीय संघाने मजल मारली होती. परंतु त्यानंतर थेट इतक्या वर्षांनी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची कामगिरी साधली गेल्याने हे एक घवघवीत यश मानले जाते आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सर जॉर्ज थॉमस यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली जाते.

इंडोनेशिया, चीन, जपान, मलेशिया, डेन्मार्क हे असे देश आहेत ज्यांचा या खेळावर नेहमीच वरचष्मा असतो. इंडोनेशिया ने १४ वेळेला, चीनने १० वेळेला तर मलेशिया ने ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. उपांत्य फेरीत भारताने डेनमार्क वर ३-२ असा विजय मिळवला होता तर अंतिम सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूंनी बलाढ्य इंडोनेशियाला ३-० अशी धूळ चारली.

थॉमस कप चषक स्पर्धेचे हे विजेतेपद एक सांघिक विजेतेपद मानावे लागेल कारण या स्पर्धेत सिंगल्स आणि डबल्स अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी केल्याचे दिसून येते. अंतिम फेरीत किदांबी श्रीकांत याला शेवटचा सामना खेळावा लागला. यात त्याने इंडोनेशियाचा नामवंत खेळाडू जोनाथन क्रीस्टी याला सरळ दोन सेटस् मध्ये २१-१३ आणि २३-२ अशा फरकाने पराभूत केले. त्याआधी पहिल्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन या खेळाडूने इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुकाचा ८-२१, २१-१७ आणि २१-१६ असा पराभव केला.

या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर विजेतेपदाचे ‘लक्ष्य’ दूर राहते की काय? असे वाटत असतानाच लक्ष्य सेनने मात्र प्रतिस्पर्ध्यावर पलटवार करून पुढचे दोन्ही सामने जिंकत भारताला एक छान सुरुवात करून दिली. डबल्स मध्ये देखील भारतीय खेळाडूंचे हेच स्पिरीट बघायला मिळाले.भारताच्या सात्विक राज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने पहिला सेट १८-२१ असा गमावल्यानंतर देखील पुढचे दोन्ही २३-२१ आणि २१-१९ अशा फरकाने जिंकून मोहम्मद अहसेन व केविन संजया या जोडीचा पराभव केला.

क्रिकेटवेड्या भारतामध्ये बॅडमिंटन चा प्रसार अजूनही सर्वदूर झालेला नाही. खरेतर या खेळासाठी लागणारे सुसज्ज असे मैदान अजूनही अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये उपलब्ध नाही. पी.व्ही.सिंधू ने ऑलिंपिक पदक पटकावल्यानंतर आणि खास करून खास करून काही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर बॅडमिंटन खेळाविषयीची जागरुकता आणि बॅडमिंटनचा प्रसार भारतात होतो आहे हे नक्की.

अजूनही दक्षिणेकडील काही राज्यांमधून, विशेष करून हैदराबाद आणि बेंगलोर सारख्या शहरातून यशस्वी खेळाडू पुढे येत असतांना त्या तुलनेत इतर ठिकाणाहून मात्र खेळाडू तयार झालेले दिसत नाहीत. थॉमस कप चषक जिंकल्यानंतर सुनील गावस्करने या विजेतेपदाची तुलना १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट विजेतेपदासोबत केली, ती कदाचित याचमुळे. १९८३ नंतर भारतामध्ये क्रिकेटचा चेहरामोहरा बदलायला एक चांगले वातावरण तयार झाले होते, जे आजही कायम आहे. आता थॉमस चषक स्पर्धेतील विजयानंतर बॅडमिंटनला देखील असेच सुगीचे दिवस येतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा’ उत्तर महाराष्ट्रातून विविध संघटनांची एकमुखी मागणी

Next Post

‘जेठालाल’ला झटका! दया बेन, तारक मेहता नंतर आता बबिता शो सोडणार?

Next Post
tmkoc1

'जेठालाल'ला झटका! दया बेन, तारक मेहता नंतर आता बबिता शो सोडणार?

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011