इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
…म्हणून पाणीप्रश्नी हायकोर्टात याचिका
मयत आमदाराचे पत्नीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी एकत्र येणारे तमाम राजकारणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एकत्र येणार का? की फक्त राजकारण करणार? अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पाणी प्रश्नी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हे पाऊल का उचलण्यात आले ते आपण जाणून घेऊ..
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील विविध हौसिंग फेडरेशनस, आणि अनेक हौसिंग सोसायटी संस्थानी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मधील पाणी प्रश्नासाठी साठी मुंबई हाई कोर्ट मध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केली आहे आणि कोर्टाने केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, पुणे जिल्हा परिषद, इरिगेशन डिपार्टमेंट आणि इतर यांना नोटीस बजावली आहे.
माझ्या प्रिय ग्राहक मित्र मैत्रिणींनो सर्वांनी एकत्र यावे आपण राजकारणी लोकांना सोडून सरकारी अधिकारी वर्गाला त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त न करता त्यांना अकाऊंटेबल करूयात. पाणी प्रश्न हा राजकीय लोकांनी मुद्दाम भिजत ठेवला आहे. बिल्डर लोकांना बिल्डिंग बांधताना परमिशन देताना पाणी देऊ शकत नाही तर शपथ पत्र द्या असे सांगितले जाते आणि परमिशन दिली जाते.
नागरिक राहायला आले नंतर त्यांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात आणि त्यामुळे सोसायटीला लाखो करोडो रुपये हे महिन्याला मोजावे लागतात. त्याशिवाय सदर पाणी हे आरोग्याला घातक असते त्यामुळे लहान मुले, म्हातारी माणसे यांचे आरोग्यास अपाय होतो त्यामुळे डॉक्टर चे बिल वाढते.
तेव्हा तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की हा प्रश्न सोडवायचा असेल तर पॉलिटिकल लोकांना बाजूला ठेऊन आपण सर्वांनी एक होऊन सोडवला पाहिजे. हा प्रश्न फक्त पुण्यातील नाही तर सर्व राज्यातील आहे. तमाम मोठ्या शहरात असाच प्रश्न भेडसावत आहे.
प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि शासन दरबारी ह्या मूलभूत प्रश्नाला सोडवणे साठी हे राजकारणी एकत्र येत नाहीत.
एका मयत आमदाराचे पत्नीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी ते एकत्र येतात पण नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी मात्र एकत्र येत नाहीत. त्यात केवळ राजकारण करतात. आणि त्याच मुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने पुणे जिल्ह्यातील तमाम संस्था,सोसायट्या यांना एकत्र आणून ही याचिका दाखल केली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, सातारा, सोलापूर, सांगली, अमरावती येथील सर्व नागरिकांना, संस्थांना आवाहन करते की आपण या याचिकेत सर्वाबरोबर जोडून घेऊन आपल्या शहरातील पाणी प्रश्न असेल तर सोडवणे साठी एकत्र या. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आपल्या शहरातील कार्यकर्ते शी संपर्क साधा.
उठता ग्राहक नमतील विघ्ने!
याबाबत आणखी माहिती हवी असल्यास आपण अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
संपर्क क्रमांक
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777
Column Jago Grahak Jago Water Supply PIL by Vijay Sagar
Consumer Forum High Court