अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज सर्वत्र जल्लोषात सर्वत्र ठिक ठिकाणी ध्वजारोहण झाले. मात्र चांदवड तालूक्यातील वाद –वराडी येथील एका शेतकरी कुटूंबाने आपल्या शेतातच ध्वजारोहण लष्करी सैनिक समीर पवार, प्रविण लभडे यांच्या हस्ते केले. यावेळी येथील शाळेतील मुल उपस्थित होते. देशाचा अन्नदाता म्हणून बळीराजा अनेक संकट आली तरी काळ्या मातीतून आपल्याला अन्न पिकवित असतो. मात्र त्याच्या घामाला पाहिजे तो दाम मिळत नाही, शेतक-याला जीवंत ठेवण्यासाठी आणि त्याच्या घामाचा योग्य तो मोबदला मिळावा अशी विनंती करण्यासाठी शेतात तिरंगा फडवित असल्याचे या शेतकरी कुटुंबियांनी सांगितले.