नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड जवळील राहुड घाटात कांद्याच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक पहाटेच्या सुमारास पलटी झाला. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर सर्वत्र कांद्याच्या गोण्या पसरल्या होत्या. क्रेनच्या साहयाने ट्रक उभी करत असतांना क्रेनचा पार्ट तुटला व बिघाड झाला. त्यामुळे पुन्हा महामार्गावरची वाहतूक वाहतूक ठप्प झाली. या महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. रहदारीचा असलेल्या महामार्गावर जर अपघात झाला तर वाहतूक खोळंबते व वाहनांची लांब लांब रांग लागते.