बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्डाच्या परीक्षांमध्ये होणार हे मोठे बदल

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 11, 2021 | 10:44 am
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – बोर्डाच्या परीक्षांचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने आगामी काळात बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे आकलन एका परीक्षेतून होणार नसून, वर्षभराच्या अभ्यासाच्या आधारावर त्यांचा निकाल निश्चित होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षा दोन भागात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. परीक्षांमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न असतील. त्यामुळे आपोआपच घोकमपट्टीला फाटा मिळणार आहे.

बदलाची मोहीम
बोर्डाच्या परीक्षांसह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतही असाच विचार सुरू आहे. विद्यापीठांसह वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांमध्ये तणावाचे वातावरण, निकराची प्रतिस्पर्धा पाहून केंद्रीय शिक्षण मंत्रालय असा बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये परीक्षांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.

विचार करायला लावणारे प्रश्न अधिक
कोचिंग क्लास आणि रट्टा मारून परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांऐवजी विचार करणारे चांगले विद्यार्थी पुढे यावेत यासाठी काही बदल करणे अपेक्षित मानले जात आहे. वर्गामध्ये नियमित अभ्यास करणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होतील अशाच पद्धतीने बोर्डाच्या परीक्षांचा आराखडा तयार केला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत परीक्षेचा अभ्याक्रम लहान लहान भागात आयोजित केला जाणार आहे.

सीबीएसईपासून सुरुवात
या बदलाच्या मोहिमेची अंमलबजावणी सीबीएसईच्या २०२१-२२ मध्ये होणार्या बोर्डाच्या परीक्षेत करण्यात येणार आहे. त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन भागात घेण्यात येणार आहे.
निम्म्या अभ्यासक्रमाची परीक्षा पहिल्या भागात आणि उर्वरित अभ्यासक्रमाची परीक्षा दुसर्या भागात होणार आहे. दोन्ही परीक्षांचे मिळून निकाल तयार करण्यात येणार आहे. सीबीएसईसह राज्यांच्या शिक्षण बोर्डालाही अशाच पद्धतीने परीक्षा घेण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्यांच्या संपर्कात आहे.

ही प्रथा होणार हद्दपार
शिक्षण मंत्रालयाचे हे पाऊल फक्त बोर्डांच्या परीक्षांसाठी मर्यादित नसले. इतर वर्गांच्या परीक्षांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक धडा पूर्ण झाल्यानंतर एक चाचणी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांचे ज्ञान पडताळण्यासाठी घेतली जाईल. याच आधारावर परीक्षेचा अंतिम निकाल तयार केला जाईल.

२०२५ पर्यंत बोर्ड परीक्षा अशा
बोर्डांच्या परीक्षांमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची योग्यता आणि त्यांची क्षमता तपासली जाणार आहे. २०२१-२२ च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी (एमसीक्यू), संक्षिप्त उत्तरे आणि सविस्तर उत्तरे लिहिण्याचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेत असे २० टक्के प्रश्न विचारले जातील. २०२५ पर्यंत बोर्डाच्या परीक्षांमध्ये शंभर टक्के प्रश्न विचाराच्या आधारांवरच असतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नियम म्हणजे नियम! खुद्द राष्ट्राध्यक्षांनाच फुटबॉल सामना पाहण्याची परवानगी नाकारली

Next Post

नवरात्रामध्ये राशीरत्न घ्यायचंय? आधी हे जाणून घ्या…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
IMG 20211009 WA0005

नवरात्रामध्ये राशीरत्न घ्यायचंय? आधी हे जाणून घ्या...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011