बुधवार, नोव्हेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्डाच्या परीक्षांमध्ये होणार हे मोठे बदल

ऑक्टोबर 11, 2021 | 10:44 am
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – बोर्डाच्या परीक्षांचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने आगामी काळात बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे आकलन एका परीक्षेतून होणार नसून, वर्षभराच्या अभ्यासाच्या आधारावर त्यांचा निकाल निश्चित होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षा दोन भागात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. परीक्षांमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न असतील. त्यामुळे आपोआपच घोकमपट्टीला फाटा मिळणार आहे.

बदलाची मोहीम
बोर्डाच्या परीक्षांसह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतही असाच विचार सुरू आहे. विद्यापीठांसह वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांमध्ये तणावाचे वातावरण, निकराची प्रतिस्पर्धा पाहून केंद्रीय शिक्षण मंत्रालय असा बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये परीक्षांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.

विचार करायला लावणारे प्रश्न अधिक
कोचिंग क्लास आणि रट्टा मारून परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांऐवजी विचार करणारे चांगले विद्यार्थी पुढे यावेत यासाठी काही बदल करणे अपेक्षित मानले जात आहे. वर्गामध्ये नियमित अभ्यास करणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होतील अशाच पद्धतीने बोर्डाच्या परीक्षांचा आराखडा तयार केला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत परीक्षेचा अभ्याक्रम लहान लहान भागात आयोजित केला जाणार आहे.

सीबीएसईपासून सुरुवात
या बदलाच्या मोहिमेची अंमलबजावणी सीबीएसईच्या २०२१-२२ मध्ये होणार्या बोर्डाच्या परीक्षेत करण्यात येणार आहे. त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन भागात घेण्यात येणार आहे.
निम्म्या अभ्यासक्रमाची परीक्षा पहिल्या भागात आणि उर्वरित अभ्यासक्रमाची परीक्षा दुसर्या भागात होणार आहे. दोन्ही परीक्षांचे मिळून निकाल तयार करण्यात येणार आहे. सीबीएसईसह राज्यांच्या शिक्षण बोर्डालाही अशाच पद्धतीने परीक्षा घेण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय राज्यांच्या संपर्कात आहे.

ही प्रथा होणार हद्दपार
शिक्षण मंत्रालयाचे हे पाऊल फक्त बोर्डांच्या परीक्षांसाठी मर्यादित नसले. इतर वर्गांच्या परीक्षांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक धडा पूर्ण झाल्यानंतर एक चाचणी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांचे ज्ञान पडताळण्यासाठी घेतली जाईल. याच आधारावर परीक्षेचा अंतिम निकाल तयार केला जाईल.

२०२५ पर्यंत बोर्ड परीक्षा अशा
बोर्डांच्या परीक्षांमध्ये विचार करायला लावणारे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची योग्यता आणि त्यांची क्षमता तपासली जाणार आहे. २०२१-२२ च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी (एमसीक्यू), संक्षिप्त उत्तरे आणि सविस्तर उत्तरे लिहिण्याचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेत असे २० टक्के प्रश्न विचारले जातील. २०२५ पर्यंत बोर्डाच्या परीक्षांमध्ये शंभर टक्के प्रश्न विचाराच्या आधारांवरच असतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नियम म्हणजे नियम! खुद्द राष्ट्राध्यक्षांनाच फुटबॉल सामना पाहण्याची परवानगी नाकारली

Next Post

नवरात्रामध्ये राशीरत्न घ्यायचंय? आधी हे जाणून घ्या…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20211009 WA0005

नवरात्रामध्ये राशीरत्न घ्यायचंय? आधी हे जाणून घ्या...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011