India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येस जबाबदार कोण? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट

India Darpan by India Darpan
January 19, 2022
in संमिश्र वार्ता
0
भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येस जबाबदार कोण? ‘या’ तारखेला होणार स्पष्ट
0
SHARES
324
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुचर्चित संत भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्ट येत्या २८ जानेवारीला निकाल देणार आहे. आरोपी विनायकच्या वतीने अंतिम युक्तिवाद कोर्टात पूर्ण झाला आहे. याआधी अन्य दोन आरोपी पलक आणि शरद यांच्या बाजूने अंतिम युक्तिवाद करण्यात आला आहे. संत भय्यूजी महाराज यांनी त्यांच्याच राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सेवादार विनायक, शरद आणि पलक यांना अटक केली होती.

सदर आरोपी भैय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्वप्रथम पलकला अटक केली. चौकशीअंती त्याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली. तो जानेवारी २०१९ पासून तुरुंगात आहे. आरोपींनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केले होते की नाही हे येत्या २८ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.

अध्यात्मिक संत म्हणून ओळखले जाणारे भैय्यू महाराज यांनी दि. १२ जून २०१८ रोजी आपल्याच कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. महाराजांचे तीन सेवक पलक, विनायक आणि शरद यांनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली घटनेच्या सुमारे सहा महिन्यांनंतर, पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तिन्ही आरोपी तुरुंगात आहेत. आरोपी पलकच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता अविनाश सिरपूरकर, आरोपी शरदच्या वतीने अधिवक्ता धर्मेंद्र गुर्जर यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. आरोपी विनायकच्या वतीने अधिवक्ता आशिष चौरे आणि इम्रान कुरेशी यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. त्याला बळजबरीने या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे आरोपीच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले.

भैय्यू महाराजांनी विनायकवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. तरीही त्याने असे का केले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. महाराजांकडे सापडलेला मोबाईल आणि औषधांची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी फिर्यादीकडे पुरेसा वेळ होता, पण तो अद्याप झालेला नाही. फिर्यादी साक्षीदारांनीही आरोपींवर कोणतेही आरोप लावलेले नाहीत. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकालासाठी २८ जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

कवठे महांकाळ निवडणूकः आर आर आबांच्या मुलाने केली कमाल

Next Post

चर्चा तर होणारच! ममता बॅनर्जीं करणार अखिलेश यादव यांचा प्रचार

Next Post
बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीच; सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या भाजपचा मानहानिकारक पराभव

चर्चा तर होणारच! ममता बॅनर्जीं करणार अखिलेश यादव यांचा प्रचार

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group