मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत सुमार कामगिरी करून भारतीय संघ घरी परतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेतील निवड समितीची हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता नवीन समिती येणार आणि बरेच बदल बघायला मिळणार, असे अंदाज वर्तवण्यात येत होते. पण आज (शनिवार) बीसीसीआयने नवी समिती जाहीर करताना चेतन शर्मा यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवले आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा ज्या पद्धतीने पराभव झाला, त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे निवड समितीचे काय करणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेतील बीसीसीआयने तातडीने चेतन शर्मा यांच्यासह निवड समितीची हकालपट्टी केली होती. त्यामुळे पुन्हा यांच्यापैकी कुणीच नव्या समितीत बघायला मिळणार नाही, वाटत होते. अश्यात आज बीसीसीआयने नवी समिती जाहीर करीत असल्याचे सांगून चेतन शर्मांनाच अध्यक्षपदी नेमले आहे. त्यांच्यासोबत चार नवे सदस्य समितीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये श्रीधरन शरथ, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि शिव सुंदर दास या चौघांचा समावेश आहे.
मन में लड्डू फुटा
निवड समितीची हकालपट्टी झाल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंच्या मनात लाडू फुटायला लागले होते. अनेकांनी या समितीवर येण्यासाठी प्रयत्नही केले. त्यामुळे नवी समिती स्थापन होणार अशी घोषणा झाली तेव्हा बरीच नावे चर्चेत होती. यात निखिल चोप्रा, मनिंदर सिंग, नयन मोंगिया, व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, अजय रात्रा अशा अनेकांचा समावेश आहे.
फक्त शर्मा कायम
नवी निवड समिती स्थापन करताना बीसीसीआयने चेतन शर्मा वगळता एकही जुना सदस्य परत बोलावला नाही. त्याजागी नवे चार सदस्य समाविष्ट करून घेतले. समितीत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीतही बदल बघायला मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
योग्य पर्याय सापडला नाही
T20 विश्वचषक आणि आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मासह निवड समितीची हकालपट्टी करण्यात आली होती. अशा परिस्थितीत चेतन शर्माच्या जागी माजी कसोटी सलामीवीर शिव सुंदर दास (पूर्व विभाग) आणि तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारे श्रीधरन शरथ (दक्षिण विभाग) यांची नियुक्ती होण्याची आशा होती. श्रीधरन हे सध्या राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीचे प्रमुख आहेत. पण बीसीसीआयला चेतन शर्मापेक्षा चांगला पर्याय सापडला नाही आणि पुन्हा चेतन शर्माला बीसीसीआयचा मुख्य निवडकर्ता बनवले.
जास्त पैसे दिले जात नाहीत
दुसरे कारण म्हणजे मुख्य निवडकर्त्याच्या पदाचा पगार. BCCI चेतन शर्माला दरवर्षी 1 कोटी 25 लाख रुपये देते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने त्यांच्या जागी अन्य कोणाला मुख्य निवडकर्ता बनवले तर त्याला जास्त पगार द्यावा लागू शकतो. पण चेतन शर्माला 1 कोटी 25 लाख रुपये दिल्याबद्दल बीसीसीआयने त्याला पुन्हा मुख्य निवडकर्ता बनवले.
तरुणांना सपोर्ट
तिसरे कारण म्हणजे तरुणांना अधिक संधी देणे, चेतन शर्मा संघ निवड चांगली करतो. त्याने अनेक युवा खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी दिली, त्यात अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांची नावे आहेत. अर्शदीप सिंगला 2022 च्या T20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले आणि शानदार गोलंदाजी केली.
NEWS 🚨- BCCI announces All-India Senior Men Selection Committee appointments.
Mr Chetan Sharma recommended for the role of Chairman of the senior men’s selection committee.
More details 👇👇https://t.co/K5EUPk454Y
— BCCI (@BCCI) January 7, 2023
BCCI Indian Team Selection Committee Appointments
Sports Cricket