इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या फहाद अहमदशी लग्न केल्याने स्वरा भास्करवर टीका होते आहे. ही टीका वयाने लहान असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केल्याने होते आहेच पण त्याहीपेक्षा ती आंतरधर्मीय विवाह केल्याने होते आहे. आता तर अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरावर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादीचा नेता फहाद अहमदशी नुकतंच लग्न केलं. स्वराच्या आंतरधर्मीय लग्नानंतर तिच्यावर चांगलीच टीका होते आहे. श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून देत फहाद अहमदशी लग्न करताना तू घरातला फ्रीज पाहिला होतास का, अशी टीका साध्वी प्राचींनी केली होती. त्यानंतर आता अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरा भास्करला लग्नावरून चांगलंच सुनावलं आहे.
“स्वरा भास्कर जर एक सशक्त महिला असेल तर तिने लग्नच केले नसते. जर तिला १००० पुरुषांबरोबर रात्री घालवायच्या असतील तर तिचं अभिनंदन. कारण तिने अशा समाजातील व्यक्तीशी लग्न केलं आहे, जिथे भाऊ-बहिणी लग्न करतात आणि नंतर तलाक, तलाक, तलाक करतात,” अशा शब्दात राजू दास यांनी टीका केली आहे.
“स्वरा भास्करने उघडपणे इन्शा अल्लाह आणि भारत तेरे टुकडे होंगे असं म्हटलं होत. १० दिवसांपूर्वी भाऊ म्हणून संबोधित केलेल्या व्यक्तीशी तिने नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले,” असंही अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले. स्वरा आणि फहादने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी १६ फेब्रुवारीला साखरपुडा केला. आता मार्च महिन्यात ते समारंभपूर्वक लग्न करणार आहेत.
Ayodhya Mahant on Swara Bhaskar Wedding