India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बच्चू कडूंमुळे एकनाथ शिंदेंची गोची… आसामच्या मुख्यमंत्र्यांचे शिंदेंना पत्र… केली ही मागणी…. आता शिंदे काय करणार?

India Darpan by India Darpan
March 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखलं जातं. बरेचदा तर सरकारमध्ये राहूनही त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना नेत्यांचा रोष सहन करावा लागतोय. पण हे सारे तात्पूरते असते. आता मात्र त्यांना एक विधान चांगलेच महागात पडणार आहे.

बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अद्याप ते मंत्रीपदाची आस लावून बसलेले आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी त्यांनी बरेचदा सरकारला जाहीरपणे विचारणा केली आहे. पण त्यांचे वादग्रस्त विधान थेट आसाम राज्याला अंगावर घेणारे आहे. त्यामुळे आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याकडे तक्रार केली आहे.

विधानसभेत भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान केले होते. ‘महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा, तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात,’ असे बच्चू कडू म्हणाले होते.

आसाममध्ये संताप
बच्चू कडू यांच्या विधानानंतर आसाममधील सामान्य नागरिकांनी या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच या वक्तव्या विरोधात आसामच्या विधानसभेत देखील गोंधळ पहायला मिळाला. हा वाद आता आणखी वाढला असून आसामचे मुख्यमंत्री हिमांतबिश्वा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.

काय आहे पत्रात?
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यबाबत हेमंत बिस्वा शर्मा यांनी हे पत्र लिहिलं आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी, अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

संस्कृतीबद्दलचे अज्ञान
या पत्रामध्ये त्यांनी आसामच्या लोकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अतीव दुःख झाल्याचे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. ‘बच्चू कडू यांनी आसामच्या संस्कृतीबद्दल आपले अज्ञान दाखवले आहे. त्यामुळे तुम्ही आसामच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवाल,’ अशी आशा असल्याचेही त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

Assam CM Letter to Eknath Shinde Bacchu Kade Statement


Previous Post

मार्च एण्डसाठी रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व बँकांना दिले हे आदेश…. ग्राहकांना असा होणार फायदा

Next Post

देशात पुन्हा मास्क सक्ती होणार? कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींनी दिले हे निर्देश

Next Post

देशात पुन्हा मास्क सक्ती होणार? कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group