इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ४८ तासांत शाळकरी मुलींच्या आत्महत्येच्या या घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने शालेय विद्यार्थ्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे चित्र आहे.
आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएट परीक्षेचा 11वी आणि 12वीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या वर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी आंध्र प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत बसले होते आणि इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 61 टक्के होती, तर 12वीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 72 टक्के होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीकाकुलम जिल्ह्यात बी तरुण या १७ वर्षीय मुलाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. तरुण हा इंटरमिजिएटच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता आणि बुधवारी जाहीर झालेल्या निकालात तो नापास झाला होता. त्याचवेळी विशाखापट्टणम जिल्ह्यातील मलकापुरम पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीनेही आत्महत्या केली. इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षातही ती नापास झाली. विशाखापट्टणम जिल्ह्यातील कांचरापालम भागात एका १८ वर्षीय तरुणानेही परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या केली. राज्याच्या विविध भागातून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनीही गेल्या फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, आमच्या संस्थांमध्ये असे काय चालले आहे की विद्यार्थ्यांना जीव द्यायचा आहे? देशातील सर्वात मोठ्या तांत्रिक संस्था, आयआयटीमध्येही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Andhra Pradesh Board Exam Result Declared 9 Students Suicide