रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यसभेनंतर आता विधानपरिषदेतही भाजपचे शिवसेनेला ‘टश्शन’! असे आहे राजकीय समीकरण

by Gautam Sancheti
जून 13, 2022 | 6:01 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
fadanvis patil bjp

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीत 3 जागा जिंकून सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीला हादरा देणारा भाजप आता विधान परिषद निवडणुकीसाठीही असेच काहीसे डावपेच आखत आहे. विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने 5 उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा डावपेचांचा खेळ रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची सूचना होती. सत्ताधारी पक्षात कमालीची अस्वस्थता असून आम्ही 5 जागांवर लढत आहोत. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नसून आता निवडणूक होणार आहे. त्यांच्यात मोठा संघर्ष असून आम्हाला मते मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्याने एकीकडे महायुतीतील संघर्ष समोर आणण्याबरोबरच भाजपची रणनीतीही स्पष्ट केली आहे. खराब व्यवस्थापनामुळे शिवसेनेचे संजय पवार यांना राज्यसभेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केवळ दोन उमेदवार विजयी होण्याची शक्यता असताना भाजपने उत्तम व्यूहरचना करीत तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजय प्राप्त करुन दिला आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आणखी पेटला आहे. त्यातही भाजप आणि शिवसेना यांच्यातील तेढ आणखीनच वाढली आहे.

राज्यसभेत चांगलीच ठेच पोहचल्याने आता शिवसेनेचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करावा. म्हणजेच, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी स्वतंत्र डावपेच आखावेत, असे सांगितले आहे. म्हणजेच, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमुळेच राज्यसभेतील शिवसेना उमेदवार पराभूत झाल्याचा निष्कर्ष निघतो आहे.

शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “अपक्षांच्या पाठिंब्यावर कोणतेही समीकरण बिघडू शकते हे स्पष्ट आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात 20 जून रोजी 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक गुप्त मतपत्रिकेद्वारे घेतली जाते. अशा स्थितीत या निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि घोडोबाजाराची शक्यता बळावली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आघाडीला पुन्हा एकदा झटका बसला, तर ती मोठी चिंतेची बाब ठरणार आहे. एवढेच नाही तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. आणि हीच बाब भाजपने हेरली आहे.

10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवाराला विजयासाठी 26 ते 27 मतांची आवश्यकता आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की, “राष्ट्रवादीच्या जवळच्या आमदारांनी आमच्या उमेदवाराला मतदान केले नाही. मात्र यानंतरही आपण राष्ट्रवादीकडे बोट दाखवू शकत नाही कारण कदाचित त्या आमदारांना भाजपने काही आश्वासने दिली असतील.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1536324517270028288?s=20&t=fbZK8-7FC2N39TDguKs6HA

भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे आणि प्रसाद लाड असे ५ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने सचिन अहिर आणि आंशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक यांना संधी दिली आहे. याशिवाय काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार जिंकण्यासाठी 8 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे, परंतु त्यांना विजय मिळवणे कठीण आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपने पाचवा उमेदवार निवडणुकीत उभा केला आहे. आणि आता त्याच्या विजयासाठी डावपेच सुरू झाले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

७१ वर्षे वयाच्या जेष्ठ डॉक्टरांना वोक्हार्ड हॉस्पिटलने दिली नवसंजीवनी

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011