मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मुला-मुलींचे विवाह जमतात. कालांतराने त्यातील काही जणांचे घटस्फोट देखील होतात. यात नवीन नाही मात्र तरीही लगेच यासंदर्भात चर्चेला देखील उधाण येते. सध्या देखील असेच घडत आहे. दक्षिण भारतातील सुपरस्टार धनुषने पत्नी ऐश्वर्या आर धनुषपासून विभक्त होण्याचे सोशल मिडीयाद्वारे जाहीर केले आहे. त्यांच्या घटस्फोटाची ही बातमी समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला आणि काही जणांनी दु:ख व्यक्त केले आहे.
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून तिचे अभिनेता धनुष सोबत सन २०१४ मध्ये लग्न झाले होते. धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्ष जुने वैवाहिक नाते तोडले! आता असे काय घडले? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत खुद्द धनुषने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. धनुषची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धनुषने सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. धनुषने आपल्या निवेदनात लिहिले की, ‘ आमचा १८ वर्षांचा एकत्र राहण्याचा, मित्रासारखा, जोडप्यासारखा तसेच आई-वडिलांसारखा, एकमेकांचे शुभचिंतक असण्याचा, हा प्रवास खूप वाढला, पुढे समजून घेतला, जुळवून घेतला, सहन केला. मात्र आज आम्ही उभे आहोत जिथे आपआपले मार्ग वेगळे झाले आहेत. आता आम्ही वेगळे आहोत.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
निवेदनात पुढे लिहिले आहे की, ‘ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, वेगळे राहून आपण चांगले आहोत हे समजण्यास आम्हाला वेळ लागला. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि ही समस्या हाताळताना आम्हाला आमची गोपनीयता राहू द्या.’
दरम्यान, धनुष आणि ऐश्वर्या यांच्या इतक्या वर्षांच्या ब्रेकअपमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला, त्यापैकी एक जण म्हणाले- ‘मला याची अपेक्षा नव्हती, धक्कादायक आहे’. सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रमाणेच त्यांची मुलगी ऐश्वर्या देखील मोठी कलाकार असून भावनिक आहे.
धनुषची गणना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. धनुष याने साऊथमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तसेच त्याने ‘रांझना’ या हिंदी चित्रपटाद्वारे जबरदस्त फॅन निर्मिती केली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अतरंगी रे ‘ या चित्रपटातही त्याने आपली अभिनयाची ताकद दाखवली आहे. धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.