नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावातील आश्रमशाळेतील सहा वर्षीय मुलाचा बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरीश निवृत्ती दिवटे असे या बालकाचे नाव आहे. आश्रमशाळेच्या आवारात सायंकाळी हरिश खेलत असतांना बिबट्याने हा हल्ला गेला. या हल्यानंतर बिबट्याने त्याला जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. बिबट्याच्या हल्याची ही घटना आश्रमशाळेत कळताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिक नागरिकही येथे जमा झाले. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. वनविभागाचे पथकासह घटनास्थळी तातडीने आले. त्यानंतर वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी हरिश शोध घेतला. अखेर दोन तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. या आश्रमशाळेच्या मागील बाजूस अंबोली धरणाचे बॅकवॉटर असून संपूर्ण जंगल परिसर आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात दहशत पसरली असून स्थानिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.