सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापुर येथील शेतकरी तिवारी यांच्या बाजरीच्या शेतात सोंगणीचे काम सुरू असताना अचानक भला मोठा आजार निदर्शनास आल्याने सर्वांची बोबडी उडाली. या शेतक-याने तातडीने याची माहिती जवळच्या वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने शेतात धाव घेत अजगराला शिताफीने पकडले. त्यानंतर त्याला जवळच्या नैसर्गिक वातावरणात सोडून देण्यात आले. हरीण संवर्धन क्षेत्र असलेल्या या भागात हरणांबरोबर अन्य प्राण्यांचा अधिवास असला तरी अजगर या भागात आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.