इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत अखेर विजय मिळवून आव्हान कायम राखले. भारताकडून पराभूत झालेले पाकिस्तान व हाँगकाँग हे दोन संघ आज मैदानावर उतरले. पण, बाबर आजमच्या संघाने विजय मिळवून सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. या सामन्यात सुपर ४ ही नवीन फेरी खेळवण्यात येणार आहे.
क्रिकेटमध्ये अनेक सामने रंगतात. परंतु त्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सर्वांचीच उत्सुकता वाढवितो. कारण ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. खेळांमध्ये हार किंवा जित ही होतच असते. परंतु भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार याची सर्वांनाच याची नेहमी चर्चा होत असते वास्तविक पाहता हे दोन देश एकमेकांचे राजकीय दृष्ट्या शत्रू जरी असले तरी खेळामध्ये मात्र मैत्रीपूर्ण वातावरण असावे लागते आणि ते निश्चितच दिसून येते.
आशिया चषक २०२२ या फेरीतील अव्वल दोन संघ हे अंतिम फेरीत पोहोचतील. आशिया चषकाच्या अंतिम फेरीचा सामना हा ११ सप्टेंबरला खेळवण्या येणार आहे. हा सामना दुबईच्या स्टेडियममध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार तो संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून पाहायला मिळू शकतो. श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवून सुपर ४ मध्ये एन्ट्री मारली होती.
पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने येत्या रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानला भिडणार आहे. आशिया चषक स्पर्धेवर आतापर्यंत १४ पैकी सर्वाधिक ७ वेळा भारताने वर्चस्व गाजवले आहे. याशिवाय श्रीलंकेने ५ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा जेतेपद पटकावले. बांगलादेशने ३ वेळा अंतिम फेरी गाठूनही अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही.
भारताने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करताना विजयी षटकार खेचला होता. त्याने त्या सामन्यात ३ विकेट्स व नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्य, तर रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना भारताचा डाव सावरला होता. पण, आता रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी दीपक हुडा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेऊन हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही संघ 10 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमने-सामने आली होती. गेल्या वर्षी याच मैदानावर भारताने टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारची घातक गोलंदाजी यामुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता.
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँगमध्ये जबरदस्त सामना रंगला होता. पाकिस्तानने आधी फलंदाजी करत हाँगकाँगपुढे 194 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, हाँगकाँगला पाकिस्तानने दिलेल्या आव्हानापर्यंत पोहचता आले नाही. हाँगकाँगला 38 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा पद्धतीने तब्बल 155 धावांच्या मोठ्या फरकाने पाकिस्तानने विजय मिळवत इतिहास रचला. पाकिस्तानने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने हा विजय मिळवला.
सुपर 4 चे असे आहे वेळापत्रक
३ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
६ सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
७ सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
११ सप्टेंबर- फायनल, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
Asia Cup 2022 India Vs Pakistan Match Super4 Schedule
Cricket