नाशिक – अहिल्यादेवी होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटसाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने गोपिकाबाई पेशवे यांचे निवासस्थान व दहन स्थळातील तुळशी वृंदावन तोडत होते. पण, मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर काम थांबवले. स्मार्ट सिटीचे एकंदरीत काम पहाता. ऐतिहासिक वारसा स्थळ जतन-संवर्धन करण्या ऐवजी स्मार्ट सिटी कंपनी तोडण्यात धन्यता मानत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी सांगितले.