India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

३१ मे नंतरचे कापसाचे चुकारे कधी देणार? डॉ. अनिल बोंडे यांचा राज्य सरकारला सवाल

India Darpan by India Darpan
August 14, 2020
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – ‘सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच लावली आहे. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना रांग लावून हाल अपेष्टा सहन करून कापसाची विक्री केली. परंतु ३१ मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. कापसाचे पैसे शेतकऱ्यांना केव्हा देणार’ असा सवाल माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

बोंडे म्हणाले की, यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अवस्था दयनीय झाली आहे. कापूस उत्पादक संघांनी वाढीव ग्रेडरची मागणी डिसेंबर पासून केली होती पण शासनाने ग्रेडर वाढवून दिले नाही. परिणामी लॉकडाऊनच्या अगोदर अतिशय कमी प्रमणात कापसाची खरेदी झाली लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांना कापूस स्वतःच्या घरातच भरून ठेवावा लागला केंद्र सरकारने कापसाच्या खरेदी करिता पर्याप्त निधी उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा राज्य सरकार परिणामकारक रित्या कापूस खरेदीची यंत्रणा राबवू शकले नाही. शेतकऱ्यांचा कापसाच्या गाड्याच्या रांगाच रांगा खरेदी केंद्रावर दिसून येत होत्या. तीन-तीन दिवस पर्यंत थांबावे लागल्याने शेतकऱ्याला गाडी भाड्याचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागला कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागला व भ्रष्टाचाराला तोंड द्यावे. लागले एवढे सर्व दिव्य पार करूनही ३१ मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. ऑगस्ट महिना संपत असून बँका पीककर्ज देत नाही आणि कापसाचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणून शासनाने तातडीने कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी डॉ. बोंडे यांनी केली आहे.


Previous Post

नाशिकचा स्वातंत्र्य दिन सोहळा फेसबुकपेजवर लाईव्ह

Next Post

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ५८ पोलीस पदक

Next Post
रितेश मुन्नी कुमार अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक पोलीस वायरलेस महाराष्ट्र राज्य चव्हाण नगर पशन रोड पुणे

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ५८ पोलीस पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सकाळी नाश्ता न केल्यास कॅन्सरचा धोका ? खरं काय आहे

October 3, 2023

खामगावातील गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीचे सत्य झाले असे उघड

October 3, 2023

गोदरेज कुटुंबात फूट, कंपन्यांची होणार फाळणी

October 3, 2023
प्रातिनिधीक फोटो

ग्रामविकास विभागाच्या पदभरतीचा ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पहिला टप्पा

October 3, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी व्यवहार करताना घ्यावी काळजी, जाणून घ्या बुधवार ४ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 3, 2023

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर पासून सुरू, असा आहे निवडणूक कार्यक्रम

October 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group